नवीन लेखन...

सुटका

राबली होती ती –
आयुष्यभर,
आईबापाघरी आणि –
नंतर सासरीही .
जणू आयुष्यच तिचं –
आजवर,
नव्हतं स्वतःसाठी –
जराही.
आठवत नव्हतं –
किंचितही तिला,
कधी केल्याची कुणी –
विचारपूस.
“दे ग थोडा आरामही –
जीवाला,”
“मरमरून नको त्याला –
जाळूस.”
जीवनात नव्हती कधी –
कसलीच हौसमौज,
भावनाहिन शरीर मात्र –
लागायचं रोजच्या रोज.
कुरतडत ठसठसत, भळभळती –
रात्र संपायची,
तशाच एका दिवसाची –
सुरवात पुन्हा व्हायची.
आजचा दिवस मात्र –
वेगळाच होता,
सजली होती ती –
नव्या लुगड्यानिशी,
कपाळावर कुंकवाचा –
मोठ्ठा होता टिळा,
केसात भरगच्च –
वेणी होती कसलीशी.
काळवंडला चेहरा सजलेला –
होता सवाष्णलेण्यांनी ,
आज काही करायला –
तिला सांगत नव्हतं कुणीही.
पुढे मागे लगबग तिच्या –
चालली होती साऱ्यांची ,
एकवटलेली प्रथमच तिच्या –
माणसं सासर माहेरची.
पुसट आनंदाची लकेर हलकी –
उमटली होती चेहऱ्यावर,
राग लोभ कसलाच नव्हता –
आता तिचा कोणावर.
उचलले तिला चौघांनी अन् –
उसळला क्षणिक गलका,
काचाट्यातूनी आयुष्याच्या –
मरणाने केली सुटका.

प्रासादिक म्हणे,

— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..