नवीन लेखन...

सुखाची १७ पाऊले

जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे… १

मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे… २

अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे… ३

ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे… ४

सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे… ५

काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे… ६

घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे… ७

येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे… ८

क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे… ९

समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे… १०

चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११

येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे… १२

जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे… १३

सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे… १४

जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे… १५

प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे… १६

सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे… १७

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..