नवीन लेखन...

शारीरिक जखम बरी होते

शारीरिक जखम बरी होते
पण मनाचं दुखणं गहिर असतं
भावना खेळणं सहज होतं
पण मनाचं तुटण जिव्हारी घडतं..
मनातल सगळंच बोलता आलं असत
तर मोकळं आभाळ भरलं नसतं
सगळंच जर हृदयातलं कळलं असतं
तर मनालाही रडावं वाटलं नसतं..
भावनेत ओलं हळवं होणं
सहज अलवार होत असतं
मनाच्या तारा छेडल्या हलकेच
तर दुःख सहज मोकळं होतं..
कुणी खूप छान कुणी दुःखी
कुणी मस्त कुणी कष्टी
हेच तर आयुष्यात माणसांचं
राहणं मग कळतं असतं..
वेदना देतात मनाला शब्द
तरी शब्दांचं बोलणं चालू असत
कवितेच्या प्रेमात भावना रडल्या
काव्य शब्दांनी अलवार रडवून नेलं..
मनाच्या तळात साचलं निर्माल्य
कोणी भावना त्यात मोडून गेलं
माणसांना माणसं नकोशी आता
हेच सगळीकडे अंतिम सत्य दिसतं..
प्राजक्त मोहरते अलवार पहाटे
चाफ्याला तिचा न गंध कळतो
नाजूक तिच्या अंतरीचा गंध
मनात हलकेच मिटून जातो..

— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..