नवीन लेखन...

सरपंच

पंचामध्ये मोठा पंच
गावगाडा सरपंच
सरकारचा दूत जसा
प्रश्नपत्रिकेचा संच!

घडो काहीबी गावात
बोला म्हणे सरपंच
लोकांचे धरी धनुष्य
आपला तुटतो प्रपंच!

बोलणे खातो तसाच
टवाळी विषय होतो
दिसली कडक टोपी
म्हणती माल हाणतो!

आरोपीच्या पिंजऱ्यात
रोजच खडा असतो
मतदानाच्या बुथवर
विरोधी राडा असतो!

आली जर का योजना
भोवती गराडा असे
निघली त्यांची बिले
आभाळी बघत बसे!

खरं बोलायला जावा
शहाणा झाला म्हणती
खोटं बोलायच तर
पंचायत मोठी होती!

तोंडदाबी बुक्की मार
घरावर तुळसीपत्र
शेंबडे पोर देते दम
मग मुळव्याधी सत्र!

नळ बघा, घाण बघा
मिटवा त्यांची भांडणं
नको नको म्हणताना
गळा आयोग लोंढणं!

हापशावरची चर्चा
तशी पांदीलाबी होते
सरपंच वरनं शाबूत
आत भुंगा पोखरते!

याचे दोन, त्याचे दोन
गुमान कामे करतो
भूषण एवढेच की
माणसांत देव पाहतो
पंचामध्ये….

— विठ्ठल जाधव.

संपर्क – ९४२१४४२९९५

शिरूरकासार, जि.बीड

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..