नवीन लेखन...

ऋतू

किती रात्री अशाच जागवल्या, राजसा तुझ्या स्मृतींमध्ये,
वाट पाहताना जीव थकला,
मन चिंतातूर आतमध्ये,—

सारखे हे काळीज उले,
चंद्र उगवे हा डोईवरी,—
का सवतीने वाट अडवली,
मोहात पाडत तुला सत्वरी,–!!!

कितीक दिन होऊन गेले,
ना निरोप कसला संदेश,
तू गेल्यावर भोवताली,
वाटे हा परकाच प्रदेश ,–!!!

भोवती आहेत नाती सारी,
आवडते ही मज सासुरवाडी,
राम नाही पण त्यात कुठला ,
एकली भासते मी संसारी,–!!!

रामरगाडा अवती असता,
सांगाया कोणास जावे ,
दुःख तुझ्या विरहाचे रे,
कोणापाशी मोकळे बोलावे,–!!!

आता येईल जीवा बेचैनी,
कसे त्यास रमवावे,
डोळे लावून बसू किती,
दूर तू त्या परागणी,–!!!

नसते तुला कधीच चिंता,
घरच्या आपल्या माणसांची,
ते सगळे मात्र जीव टाकती,
कशी तुझी बेपर्वा वृत्ती,–!!!

मनमोर माझा नाचेल खरा,
जेव्हा कधी येशील तू ,–
इतरांसाठी असेल ग्रीष्म, माझ्यासाठी फुलेल ऋतू –!!!

हिमगौरी कर्वे.©

Avatar
About हिमगौरी कर्वे 320 Articles
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..