नवीन लेखन...

रोपण – एक डागडूजीची प्रक्रिया

बाल कवीची कविता वाचीत होतो.

हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीचे
त्या मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती.

सुंदर गवतांची हिरवळ असलेले गालिचे बघण्याचा व अनुभवण्याचा योग अमिरीकेतील वास्तव्यात असलेल्या मुलाकडे   प्रखरतेने येत असे. प्रशस्त घरे सभोवतालची बाग, त्यातील रंगबिरंगी फुले आणि सारा परिसर गवतानी अच्छादलेला जणू गवताचे गालिचे सर्वत्र पसरलेले बघून मन खूपच प्रसन्न होत असे. वाढणाऱ्या गवताची नियमित कटिंग केली जात असे. त्यामुळे जमिनीवर फक्त एक दीड इंच उगवलेले तृण, त्यातील सारखेपणा व मउ   परंतु नाजूक बोचरेपणा त्यावर चालताना एक वेगळ्याच स्पर्शाची जणीव होत असे. कदाचित म्हणूनच त्याला गालिच्याची उपमा दिली असावी. बागेतील पट्ट्यामध्ये  तीन चार  ठिकाणी गवताची वाढ अनियमित झालेली दिसली.  त्यामुळे तीन वा चार चौरस फुटांचे पट्टे उघडे पडून त्यावर  गावत वाढलेले नसल्याचे जाणवले. पाणी व कीटक नाशक फवाऱ्याचा  मारा नियमित मिळत असून देखील.

सुटीचा दिवस मुलाने नर्सरीकडून तयार गवताच्या गालिच्याचे 3×3 असे कांही शिट्स अर्थात तुकडे आणले होते. कारखान्यात केलेले हे तुकडे होते. माती व खत  यांचे मिश्रण प्रेस करून. त्यावर गवताचे रोपण केलेले होते. त्यामुळे एखाद्या गालिच्याच्या तुकड्या प्रमाणे हे भासत होते. फक्त त्यांत गवताचा  अर्थात जीवन्तपणाचा भाग नजरेत भरत होता. मुलाने प्रथम बागेतल्या  अनियमित झालेल्या व गवताची योग्य वाढ न झालेल्या पट्याची थोडीशी खोदाई केली. सर्व स्थर सारखे केले. पाण्याची फवारणी केली. ते गवताचे आणलेले शिट्स त्या जागेवर  घट  बसवून  दिले.  थोड्याच दिवसात सारा परिसर  एकसंघ झालेला  जाणवला. एक मोठा गवताचा गालीच्या तेथे अंथरल्याचा  भास होऊ लागला.

हे सर्व बघताना वैद्यकीय जिवनातील एक अनुभव आठवला. अपघातामध्ये भाजलेल्या एका व्यक्तीला आणले होते. चेहरा छाती व पोटाच्या  भागावर जाळल्याच्या जखमा झाल्या होत्या. कांही भागाची कातडी  पूर्ण जळून गेल्यामुळे जो ग्याप पडला होता,  त्या ठिकाणी कातडीचे रोपण ( Skin transplant )   केले गेले.

जखमा चांगल्या, निर्जंतुक केल्या गेल्या. नंतर त्याच व्यक्तीच्या मांडीवरची, पायावरची, हातावरची पाठीवरची कातडी शस्त्र मशीनने छीलुन  काढली गेली. त्याचे लहान लहान तुकडे जळलेल्या व न भरलेल्या जागेवर व्यवस्थित लाऊन मलमपटी केली गेली. चांगली ड्रेसिंग केलेली चामडी रोपन पकडली जाऊन कातडीचा भाग पुर्वव्रत झाला. जेथून कातडी काढली होती त्या जागी पुन्हा कातडी येऊ लागते. कातड्याच्या  रोपनामध्ये त्याच रोपनाची कातडी रोपनासाठी गरजेचे असे नाही. कुण्याही व्यक्तीची निरोगी कातडी देखील घेतली जाते. फक्त ती घेण्यास योग्य असावी. गवताच्या रोपन केलेल्या गालिच्यात व देहाच्या कातड्याच्या रोपन केलेल्या प्रक्रियेमध्ये बरेच साम्य असते. जिवंत प्राण्यातील अवयांची सतत होणारी वाढ झीज व सुधारणा हे अत्यंत  महत्वाचे गुणधर्म आहेत.

ह्याचाच आधार रोपन ह्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने घेतला जातो. निकामी झालेले अपघात ग्रस्त झालेले अवयव पूर्णपणे बदलण्याची प्रक्रिया ह्याचमुळे साध्य केली जाते.

नेत्रदान किडनीदान,  हार्ट ट्रान्सप्लांट कातडी दान आणि ह्याच प्रकारे जवळ जवळ सर्व अवयवांचे रोपन करणे साध्य झाले आहे. मेंदूच्या बाबतीत मात्र वैद्यकीय शास्त्र अजून परिपूर्ण झालेले नाही.

बागेतल्या कुंड्यात झाडे लावावी, नको असलेली काट छाट करावी दोन झाडांचे एकत्र रोपण करावे, हे सारे जितके सहज व शक्य झालेले आहे तसेच मानवी देहावर देखील सर्व प्रक्रिया शक्य होत आहेत. तो काळ आता नजीक येऊ लागला आहे जेव्ह्ना प्रयोग शाळेत जिवंत देहाची निर्मिती सहजतेने होईल. ह्यात शंका नसावी.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..