नवीन लेखन...

रवंथ

मार्गावरी विद्येच्या, वाहतात शिशु, पुस्तकांचे भारे ।वाटें पालकां, वार्धक्य अपुले, सुखविणार ते सारे ।।खाऊनि खस्ता अनेक, पालक, खाती खुषीत गाजरे ।फूटूनि पंख, उडतांच पाखरे, येती अनुभव बोचरे ।।येती अनुभव बोचरे ।।१।।वेळेस देऊनि, अपुला पाट ही, वाढविती, पाल्याची ऐट ।जपती अपुल्यापरी, न मिळण्यात, यातना तयांना, थेट ।।हातचे न ठेवुनि कांही, देण्यास झटती, तयांना निवारा ।सरतांच सर्वचि, विकलांगी, जाते कठीण, मिळणे सहारा ।।जाते कठीण, मिळणे सहारा ।।२।।सारेच जगीं, सदा, असेच घडते, असे कधीच नसते ।म्हणतात म्हणुनि, पेरावे तसे ते, नेमेचि उगवते ।।परी, असतो, भ्रममनीं, पेरलेले सारेच तरारते ।खडकावरी पेरलेले होते, हमखास करपूनि जाते ।।हमखास करपूनि जाते ।।३।।कुरकुर सारखी, नाही ऐकत, मुले आजकालची ।किरकिरी करिती, पालक, मौज अपुल्याच जीवनाची ।।पाठीं मुलांच्या, लावितां पिरपिर, अपुल्याच विचारांची ।म्हणती मुले, “आतां वेळ तुमची, ज्ञांत, चुप्प बसण्याची ।।ज्ञांत, चुप्प बसण्याची ।।४।।वाढविती सारे, सगळे, “संसार-गुंता” अपुल्या परीने ।“स्वांत्य-सुखाय” होते वाढ गुंत्यात, आपल्याच इच्छेने ।।असतां वाढवित गुंता, मन, आनंद लहरींवरी नाचते ।सोडवविणे अपुलाचि गुंता, जातां कठिण, कां खटकते ।।जातां कठिण, कां खटकते ।।५।।जे जे उगवळे, सारेचि ते ते, मधु-गोड मानूनि घ्यावे ।जीवनीं उरल्या, नसावे शल्य, निसटलेल्या क्षणांचे ।।न वाढतां क्षमता मनाची, गिळूनि मूग, स्वस्थ बसावे ।बसूनि निवांत, करावे रवंथ, अपुल्याच भूतकाळाचे ।।अपुल्याच भूतकाळाचे ।।६।। -गुरुदास / सुरेश नाईक६ फेब्रुवारी २०१२“समर्पण ध्यान शिबीर”पुणे – ३०
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..