नवीन लेखन...

प्रकाशात न आलेले सर्ग !

“रफ्तार ” मधील मुकेशचे “संसार हैं एक नदियां ” हे माझं प्रचंड आवडतं गाणं !

कधीतरी पत्नीशी बोलताना मी त्यातील एक ओळ गुणगुणलो होतो- ” वो पाप नहीं होता, जिसे आत्मा ना माने ” ही तशी अध्यात्मिक कल्पना – तिला साहजिकच खूप आवडली. खूप वर्षे, अनेकदा हे गाणे मिळेल तिथे तिने आणि मी ऐकले, पण इतकी सर्वांगसुंदर कल्पना एकाही कडव्यात पुन्हा ऐकू आली नाही- अगदी आशाच्या आवाजातील ओळींमध्येही. एवढे सुंदर काव्य माझ्या बसकी बात नाही तेव्हा सोडून दिला शोध.

काल उगाचच “रफ्तार ” लावला तू -नळीवर ! या ओळी दोन्हीवेळा नव्हत्याच. चित्रपटाच्या शेवटी (अगदी एक मिनिट राहिले असताना) मदनपुरीला गोळी लागते. मौसमीला तो विनवतो- ‘विनोद मेहराशी लग्न करायला.” डॅनी कडून उष्टावली गेलेली मौसमी याला नकार देते आणि मदनपुरी मुकेशच्या स्वरात तिला हे अध्यात्मिक सत्य सांगतो- ” वो पाप नहीं होता, जिसे आत्मा ना माने ! ” पटकन पत्नीला हाकारून हा खूप काळ चाललेला शोध एकदाचा संपविला.

दुसरे मुकेशचे माझे प्रचंड लाडके गाणे – ” जाने कहाँ गये वो दिन ! “. राज कपूरच्या “जोकर” मधील ही दर्दभरी व्यथा (समोर बसलेल्या एकतर्फी प्रेमाच्या तिघींना सांगताना) कोरडा ठक्क मुकेश अवघ्या दोन कडव्यांमध्ये संपवतो आणि आम्ही त्यावरच आजपर्यंत संतुष्ट होतो. एकदा तू -नळीवर कमलेश अवस्थीच्या आवाजातील हे गाणे ऐकले तेव्हा त्याने हातात लागलेली दौलत उधळत जाहीर केले – ” या गाण्याचे आजवर न ऐकलेले एक कडवे ऐका -”

” पत्थर को हमने पूजकर अपना खुदा बनाया था ! ”

स्वर्गवासी मुकेशचे पाय पुन्हा एकदा धरावेसे वाटले.
आणि नुकताच मुख्तार शाहचा एक लाईव्ह शो पाहायला मिळाला. निवेदिका खाडिलकर बाई म्हणाल्या – ” अहो, हे जाने कहाँ चक्क पाच कडव्यांचे हसरत जयपुरी साहेबांनी लिहिले होते, पण जोकर आधीच खूप लांबलचक झाला असल्याने राज कपूरने तीन कडवी उडवली. ” पूर्ण गाणे ऐकून आत्ता कुठे कान तृप्त झाले.

मदन मोहन नामक अवलियाला अशीच खूप गीते रचून ठेवायची सवय होती, यश चोप्रा नामक कानसेनाने संजीव कोहलीच्या हातून तो खजिना ‘वीर -जारा ” मध्ये नव्याने पडद्यावर आणून आपल्या श्रुती धन्य केल्या.

रोशन साहेबांच्या असंख्य चाली त्यांच्या सुपुत्राने (राजेश रोशन ने) त्यांच्या पश्चात खुल्या केल्या. बापाने इतकी सुरेल “विरासत ” मागे ठेवून जाणे, हे मुलासाठी किती धन्यत्वाचे – पोराची जिंदगी बनून गेली.

कित्येक कवी,लेखक,साहित्यिक आपले सगळेच लिखाण छापतात/ प्रकाशात आणतातच असे नाही. खूपसे सर्ग अंधारातच राहतात. आपल्या-तुपल्या सारखे रसिक अतृप्त राहतात जीवनभर -आपला काहीच दोष नसतानाही या खजिन्या पासून आपण वंचित राहतो. खूपसे गायक/ अभिनेते त्यांचे सगळे कर्तृत्व पडद्यावर/रंगमंचावर आणतातच असे नाही. शास्त्रीय संगीतातील उस्तादांनी स्वतः निर्मिलेले सगळेच राग/बंदिशी आपल्या कानी पोहोचत नाहीत.
कालचा “इंडियन आयडॉल “मधील संतोष आनंद यांचा व्हिडीओ सगळीकडे फिरतोय. त्यांत नेहाचे सगळेजण कौतुक करताहेत – ” पाच लाख त्यांना दिल्याबद्दल.” पण मला विशाल दादलानी आवडला . त्याने संतोषजींना विनविले –

” मी तुमच्यासाठी एवढेच करू शकतो- तुमच्या काही अप्रसिद्ध रचना असतील तर मी तुमच्या परवानगीने त्यांना चाली लावेन आणि जगापुढे आणीन.”
संतोषजींच्या डोळ्यात दीपज्योती उमलल्या.

मला आस लागलीय – हे सर्ग तरी कधीतरी खरंच प्रकाशात यावेत !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..