नवीन लेखन...

पर्जन्य काळी व्यवस्थापन (सुमंत उवाच – ५७)

पर्जन्य काळी व्यवस्थापन
भार घ्यावा निसर्गाचा आपण
उत्कृष्ठ असावे नियोजन
शरीराचे!!

अर्थ

पावसाळा सुरू झाला की निसर्गाला सौंदर्य प्राप्त होते. ठिकठिकाणी निसर्ग खुलून जातो, हिरवीगार वनराई फुलू लागते, फुलांच्या गालिच्यांनी धरती परत एकदा आपलं शरीर मुक्तपणाने सजवते पण त्यास माणूस एक संधी म्हणून त्याची ओढ आपल्या तुंबड्या भरण्यासाठी करून घेतो आणि पावसाळा मृत्यूचे द्वार उघडायला कारणीभूत ठरतो.

समर्थांनी बाग प्रकरणात फार अमूल्य असे व्यवस्थापन आखून दिले आहे या निसर्गाला आपलंसं करण्याचे. आपण पावसाळ्यात निसर्ग त्याच्या कलेने जर स्वीकारला तर त्यापेक्षा जास्त सुख दुसरं काही नसेल.

आणि या ऋतूत आपलं शरीरही नीट ठेवणं फार महत्त्वाचं असते. काय खावे काय खाऊ नये, काय प्यावे काय पिऊ नये याची काळजी घेतली की कोणताही विषाणू आपल्याला क्षीण बनवू शकणार नाही. तेव्हा काळजी घ्यावी सर्वांनी. जलधारा या आपल्याला जगायला कारण आहे त्यास शेवटाला घेऊन जाण्याचे धाडस न केलेलेच बरे.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..