नवीन लेखन...

माझा चड्डीयार : भाग ५

भाग- ५

आमचे घराणे तसे फार सनातनी. जबरदस्त ब्राह्मणी पगडा. खाण्या पिण्यांत एकदम घासपुस खाणारे. अर्थात   Pure Vegetarian हे सारे माझ्या आजोबाच्या  काळातले. माझ्या वडीलांच्या पिढीपासून त्यांत थोडीशी सुधारणा झाली म्हणा. थोडीशी म्हणजे त्या तथाकथीत संपुर्ण शाकाहारी संकल्पनेत कोंबडीने अंडे घातले. याला एक कारण माझे वडील. शिक्षण व स्वकर्तृत्व याच्या आधारे ते निझामी राज्यांत तालूकदार अर्थात Collector ह्या पदावर विराजमान झाले होते. म्हणून संस्कारीक कर्मठपणा अंगी असून देखल परिस्थीतीजन्य वातावरणी बदल हा होणे अपेक्षीतच.

तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू.

एकदा त्याच्या खाण्याच्या डब्यांत ब्रेड व अम्लेट होते. “ भगवान थोडेसे अम्लेट खातोस का ? खुप चवदार लागते. आवडले नाही तर पुन्हा खाऊ नकोस.  “     मी त्याक्षणी भाऊक झालो. Temptation येऊ लागले. आपण शाकाहरी अंडे कसे खाणार. घरांत त्यावेळी समोर कुणाच नव्हते. आजी तर थेट देवघरांत. आई स्वयंपाक घरांत. वडील बाहेर गेलेले.  मला कुलकर्णी गुरुजींचे शब्द आठवले. वर्गांत एकदा शिवताना ते म्हणाले होते. जे खाद्य पदार्थ असतात, त्यांत सर्व खाद्य घटक असावेत. जसे Proteins Carbohydrates, Oils, Vitamins, इत्यादी. पदार्थांत भेदभाव करु नये. प्रोटीन्स तर सर्वात महत्वाचे…. अर्थांत सर्व विचार व खाण्याची उत्पन्न झालेली इच्छा यानी त्या क्षणी तरी विजय मिळविला. मी मारुतीने देऊ केलेले त्याच्या डब्यातील अम्लेट घेतले. मला त्याची चव एकदम आवडले. अर्थात् हे सांगणे नको, की त्यानंतर मारुतीला अनेकदा त्याच्या खाण्याच्या डब्यांत अम्लेट हा पदार्थ करुन आणावा लागला. आजीची, आईची (ताईची) व वडीलांची (भाऊंची) नजर चुकवित सारे खाणे होई.

मारुतीने पुढील जीवनांत,  आगदी थेट District Health Officer Class I झाल्यानंतर देखील मला Non Veg पदार्थ खाण्याचा बराच प्रयत्न केला. घरी वा बाहेर हॉटेलमध्ये पण मी बधलो नाही. कारण निसर्गाने माझ्या पाठीवर जन्मतः ब्राह्मण हा शिक्का मारला होताना. तो कसा मिटणार.

मैत्रीच्या धाग्याचा अशाच एका प्रसंगात खुप समाधानी अनुभव आला. तो औरंगाबादला शासनात कार्यारत होता. मला बालरोग तज्ञ होण्यासाठी UNICEF ह्या संस्थेची शैक्षणिक शिष्यवृत्ती (scholarship) मिळाली होती. तसे शासकिय आदेश मिळाले. मला मुंबईला जाणे व स्थलांतरीत होणे गरजेचे होते.  नुकतीच आम्हाला जुळी मुले झाली होती. घरामध्ये घरचे म्हणून कुणीतरी वयस्कर हवे होते. मारुतीला माझी अडचण कळताच, त्याने आपल्या आईला काही दिवसासाठी मजकडे आणून सोडले होते. न विसरता येणारी ही घटना

तसे औरंगाबादला मारुतीच्या व माझ्या निवृत्तीच्या काळानंतर ही अनेकदा भेटी झाल्या. मला तो दिवस विशेषकरुन आठवतो. त्याच्या मुलगाही डॉक्टर झाला.  उच्य पदवी प्राप्त केली. औरंगाबादला एक मोठे स्पेशालीस्ट सेंटर काढले. मी ते बघण्यासाठी गेलो होतो. सर्व प्रशस्त व मोठे हॉस्पीटल बघीतले. आपरेशन थियेटर , सर्व अधूनिक यंत्र सामुग्री बघीतली. पेशंटची प्रचंड वर्दळ बघीतली. मारुतीच्या सर्व नातेवाइकांची भेट व परिचय करुन दिला गेला.

मारुतीचा हा फोफावला गेलेला प्रचंड वटवृक्ष बघताना खुप मन भरुन आले. समाधान व आनंद वाटला. सारे जीवन मारुतीने सार्थकी घातले होते. जीवन म्हणजे काय, ?

ते कसे जगावे व यशस्वी करावे, हा एक विलक्षण व प्रचंड संदेश त्याने स्वअनुभवाने स्वतःच्या जीवन चक्रामधून दिला.

न जाणो एका गमतीच्या प्रसंगाची याच भेटीत जाण झाली. दोन टोकाचे जीवन प्रसंग त्याच वेळी समोर आले. वय सात वर्षे. मी मारुतीच्या घरी पहील्यांदाच गेलो होतो, तो दिवस आठवला.

          मला प्रथम भिती वाटली होती. त्या झोपडीत शिरताना.  सारे फ्लोअर अर्थात ती झोपडीमधली जमीन सारवलेली नव्हती, खुप ठिकाणी विखुरलेली होती, काडी काट्यांचे तुकडे, अनेक खिळे, अस्ताव्यस्त पसरलेले व पडलेले दिसले. पायाला कांही टोचुन हानी होईल, ही छुपी जाण त्यावेळी मनात आली होती. परंतु मी मनाला सावरले….

आणि आज तसेच. वयाची ७० वर्षे झाल्यानंतर जेंव्हा मारुतीच्या घरी आलो.

          मला प्रथम भिती वाटली होती.   त्या घरांत शिरताना. सारे फ्लोअर अर्थात ती विशाल घरातल्या जमनीची फरशी लक्ष ओढून घेत होती. अतिशय चमकदार, चकचकीत, स्वच्छ प्रचंड गुळगुळीत. मी बघत होतो. न जाणो माझा पाय घसरुन माझी हानी होईल ही छुपी जाण त्या वेळी मनात आली. परंतु मी मनाला सावरले….

मारुतीने फक्त झोपडीच बदलली नव्हते, त्यातील रहाणीमान बदलले नव्हते, तर संपुर्ण जीवन जगण्याची Style  च बदलून टाकली होती. संपुर्ण संस्कार बदलले होते.  आणि हे करताना त्याने आपले सर्व घराणे, त्याच्यातील माणसे, खऱ्या अर्थाने सारा समाज बदलाचे संकेत जगापूढे ठेवले.

मारुती माझा तो चड्डी यार ! अर्थात बाल मित्र.  वयाच्या सात वर्षापासून सहवास  व संबंध.  तरी मी त्याला, त्याच्या विलक्षण व अफाट कर्तृत्वाला, जगण्याच्या जिद्द, धडपड, व यश मिळवण्याच्या कार्यक्षमतेला  सलाम करतो.

 आज सुट बुट घालत हाती यशाचा ध्वजा फडकवत चाललेला   

                                 डॉ. मारुती शंकरराव अतकरे

बाल जीवन चक्राच्या आठवणी सांगणारा

डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
संपर्क- ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..