नवीन लेखन...

माटोळी – फळे व भाज्यांची गणपतीपुढे आरास

Matoli - A decoration made from Flowers and Vegetables for Ganapati

गणपतीपुढे पर्यावरणस्नेही आरास - फळे, फुले,भाज्या यांची माटोळी
गणपतीपुढे पर्यावरणस्नेही आरास -  फळे, फुले,भाज्या यांची माटोळी
गणपतीपुढे पर्यावरणस्नेही आरास – फळे, फुले,भाज्या यांची माटोळी

गणपतीपुढे काहीतरी पर्यावरणस्नेही आरास करण्याचे ध्येय ठेऊन मी माझ्या गणपतीसमोर जशी कोकण- गोवा येथे माटोळी बांधली जाते तशी माटोळी तयार केली होती. याला माटी किंवा अंबारी असेही म्हणतात.मुंबईत ज्या ज्या भाज्या – फळे मिळू शकल्या त्या त्या माटोळीला बांधल्या होत्या.

गणपतीचे आगमन हे निसर्गाच्या समृद्ध काळी होते. पावसामुळे फळे, फुले,भाज्या यांची रेलचेल होते. त्यातील पहिले फळ, पहिली भाजी देवाला अर्पण करण्याचा हेतू यामागे असतो.

फुले ही देवाला वाहिली जातातच पण फळे आणि भाज्यांचे काय ? म्हणूनच एक लाकडी चौकट गणेशापुढे बांधली जाते. त्यावर त्यावेळी उपलब्ध होणारी फळे, भाज्या, फळभाज्या बांधून सजावट केली जाते. १०० % पर्यावरणस्नेही अशी ही आरास असते.पत्रीमुळे जशी आपोआपच वनस्पतींची ओळख होते तशी यामुळे भाज्यांची ओळख होते.

गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात. गोव्याच्या श्री. भूषण भावे यांनी माटोळीवर लिहिलेल्या कोंकणी पुस्तकाला कर्नाटक सरकारचा ” सर्वोत्तम कोंकणी पुस्तक पुरस्कार ” मिळाला होता.

मुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गावाकडची पार्श्वभूमी सरत चाललेल्या अनेक जणांनी आपल्या मुलांना मुद्दाम आणून माझी आरास दाखविली होती. ज्येष्ठ मंडळी तर मनोमनी थेट आपापल्या गावीच पोचली होती.

आपणही यावर्षी ही आरास करू शकता. !

— मकरंद करंदीकर,
अंधेरी ( पूर्व ), मुंबई,

Avatar
About मकरंद करंदीकर 43 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..