नवीन लेखन...

मन की बात – परतफेड

एखाद्याने आपल्याकडील शिगोशिग भरलेल्या भांड्यातून वाटीभर दुध मित्राला देणं आणि त्या मित्राची कुवतच वाटीची असताना, त्या पहिल्या ‘एखाद्या’ मित्राच्या अडचणीच्या वेळेस दुधासहीत अख्खी वाटीच त्याला देऊन टाकणे, यातील त्या ‘देण्या’ला परतफेड म्हणावं की आणखी काही हे माझ्या लक्षातच येत नाहीय..यातील वाटीच्या मालकाचं देणं मोठं की भरलेल्या भांड्याच्या मालकाचं?

आणखी स्पष्ट करून सांगतो.
ज्याच्याकडे पोह्यांपेक्षा जास्त दौलत नाही अशा सुदाम्याने त्यचा मित्र कृष्णाला ते पोहे प्रेमाने देऊन टाकले. अवघ्या वसुंधरेचा मालक असलेल्या योगेश्वर कृष्णाने त्यवर सुदाम्याला एखादा वाडा, काही गो-धन, सोनं-नाणं दिलं. याला निव्ळ परतफेड म्हणता येईल का? सुदाम्याचं देणं मोठं की कृष्णाचं?

माझ्या मनातला हा गुंता सुटता सुटत नाहीय कारण त्या वाटीचीच मालकी असलेला तो मित्र पुढे जर काही अडचणीत आला तर शिगोशिग भरलेल्या भांड्याचा मालक मित्र, “मी परतफेड केलीय” असं स्वत:शी बोलून गप्प राहू शकतो का?
देण्याचा किंवा परतफेडीचा विचार केला तर मग ती ‘मैत्री’ म्हणावी का हा आणखी एक उपप्रश्न..

— नितीन साळुंखे
9321811091
astroganesh.in
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..