नवीन लेखन...

मनाच्या नदीने वाहतच रहावं

मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
झाले गेले सारे
ते विसरून जावं

वाटेवरच्या वळणावर
थोड्यावेळ थांबावं
अपरिचित काही मनांना
प्रेमानं जोडावं

मनाच्या काठावर
कधी शांत बसावं
चिंता विवंचनांना
अलगद पाण्यात सोडावं

येणाऱ्या साऱ्या प्रवाहांना
आपल्या पोटात घ्यावं
जिवलगांच्या दूःखांना
कसं प्रेमाने सहावं

मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं

मनाच्या नदीने
कसं संयमाने वहावं
संतापाच्या परिणामांना
शांत प्रेमानं भरावं

मदत हवी त्यांच्याकडे
जरूर कधी वळावं
पण आपल्या ध्येयापासून

कधी नाही ढळावं

मनाच्या नदीने कसं
जास्त नाही रेंगाळावं
चंचल अशा मनाला

त्या विध्यात्यास अर्पावं

मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
झाले गेले सारे
ते विसरून जावं.

डॉ.सुभाष कटकदौंड

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..