नवीन लेखन...

कविते….

तू आता आमच्या सोबत कायमच असतेस

खातांना,पिंताना,जगतांना..
इतकंच काय मरतांनाही.

शाळेत असतांना फार कठीण वगैरे वाटायचीस
बाईंनी,सरांनी समजून दिल्या शिवाय समजायची नाहीस.

तेव्हा वाटायचं ही आणी हिला लिहीणारे वेगळ्याच जगातले लोक की काय

तेव्हा फार न कळणारी,दूर्बोध वगैरे..
आताशा का इतकी सहज ग..?

तुलाही माणसांसारखी नाव वगैरे कमवायची हौस लागलेली दिसते

आधी आम्हाला वाटायचं यमकाने
टाळीवर टाळी द्यायला हवी
तरच कवितां तयार होईल
ते काम कुणीही सहजरित्या नव्हतं ग करू शकत..

पण हल्ली तू बोलता बोलता ही तयार होतेस..मुक्तछंदात वगैरे
आणि आजकाल यमकाची टाळीही अशी असते की ती वाजतही नाही

मग लगेच तू आणि कवी वगैरे नावारूपास येता
पण नेमकं कोण कूणामुळे नावारूपास येतं काही कळतच नाही अग

काहीही असो आमच्यासारख्या साध्या लोकांनाही तू कळायला लागलीस..
भावलीस हे जास्त महत्वाचं.

आधी तू राजघराण्यातली वगैरे वाटायचीस
आता आमच्यातलीच वाटतेस..
आम्हाला जसे स्वांतत्र्य मिळाले तसेच तूलाही मिळाले का ग?

पण सांगू का..
स्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे
मग आपण ते कसे का वापरत असू
काय फरक पडणार असतो..
नाही का?
(ते कसे वापरतो हा प्रश्नच आहे म्हणा)

काय म्हणालीस..
मी तूझ्याशी बोलता बोलता तयारही झालीस मुक्तछंदात !

व्वा भारी बयो
किती सहज ग तू!

© वर्षा पतके-थोटे
22-10-2018

Avatar
About वर्षा पतके - थोटे 12 Articles
मी लघू कथा,कविता ,ललित ,लेख इत्यादी साहीत्यातील लेखन प्रकार लिहीते.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..