नवीन लेखन...

कांगावाखोर चोराच्या उलट्या बोंबा

२६.०२.१९

संदर्भ – विविध टी. व्ही. चॅनलवरील आजच्या बातम्या :
भारताचा POK मधील तीन दहशतवादी कँपस् वर यशस्वी हवाई हल्ला

• पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला आज भारतानें चोख प्रत्युत्तर दिलें, आणि आपल्या हवाई दलानें सर्जिकल स्ट्राइक करून POK मधील ३ वेगवेगळ्या ठिकाणचे दहशतवादी तळ संपूर्ण उध्वस्त करून दहशतवाद्यांची मोठी जीवितहानीही केली. कुठलीही सिव्हिलियन कॅज्युअल्टी झालेली नाहीं.

• या हल्लानें पाकिस्तानच्या वल्गनांना चोख प्रत्युत्तरही दिलें आहे. आजवर भारत फक्त तोंडी reaction देत असे, केवळ निषेध करत असे. आज त्यानें, पाकिस्तानला समजेल अशा भाषेत ठोस प्रत्युत्तर दिलें.

• यानंतर पाकिस्तानची भलतीच गोची झाली आहे.

– ‘हे हल्ले दहशतवाद्यांच्ता तळावर होते’, असें त्याला म्हणतां येत नाहीं, कारण पाकिस्तानचा ऑफिशियल स्टँड आहे की आमचें सरकार दहशतवाद्यांना सपोर्ट करत नाहीं, आमच्याकडे असे तळ नाहींतच.

– बरें, याला ‘भारताचें पाकवर आक्रमण’ असेंही म्हणतां येत नाहीं. कारण हे हल्ले ज्या ठिकाणांवर झालेले आहेत, ती आहेत POK मध्ये. काश्मीर ही डिस्प्यूटेड टेरीटरी आहे, असा कंठशोष पाक करत असतो. म्हणजेच, त्या दृष्टीनें POK हा भूभाग डिस्प्यूटेडच आहे. त्यामुळेंच तर, त्या भूभागात भारत-पाकमध्ये इंटरनॅशनल बॉर्डर नसून ‘लाईन ऑफ कंट्रोल’ ( LOC) आहे.

POK हा काश्मीरचा भाग असल्यानें, भारत तर तो आपलाच प्रदेश मानतो, कारण महाराजा हरिसिंहांनी जे. अँड के. भारतात विलीन केलें होतें . त्यामुळें भारत पाकचें त्याबाबतीत कांहीं ऐकूनही घेणार नाहीं.

• म्हणून पाक सरकारपुढे प्रश्न उठला की, काय बोलून निषेध करायचा ? अखेरीस त्यानें, ‘भारतानें LOC पार करून हल्ले केले’, अशा शब्दांत निषेध नोंदवला आहे.

• यामुळे पाकचेंच हंसें होणार आहे. कारण पाक तर जवळजवळ रोजच LOC च्या सँक्टिटीचें उल्लंघन करतो. तो पलिकडून भारतीय troops वर मारा करतो . एवढेंच नव्हे, तर तो LOC उल्लंघून दहशतवादीही पाठवतो. त्यामुळे, तो कुठल्या तोंडानें तक्रार करणार? आणि केलीच तर, इंटरनॅशनल कम्युनिटीत, चीन सोडला तर, कोण त्याचें ऐकून घेणार?

• कांगावाखोर पाकिस्ताननें चोराच्या उलट्या बोंबा मारल्या खर्‍या ; मात्र त्याचा उपयोग शून्यच आहे. म्हणजे, यशस्वी हल्ला झाला तो झालाच ; पण त्याबद्दल तक्रारही करतां येत नाहीं , आपलें हंसेंच होत आहे, अशी पाकची कोंडी झालेली आहे.

• हें फार छान झालें . Worth celebrating. यशस्वी हल्लाही आणि पाकची गोचीही.

— सुभाष स. नाईक.

टिप्पणी- २६०२१९/२

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..