नवीन लेखन...

जयराम हर्डीकर

३ एप्रिल १९८० ची रात्र !

“मंतरलेली चैत्रवेल ” पाहण्यासाठी, विशेषतः जयराम हर्डीकरला भेटण्यासाठी आमची वेगवान पावले सांगलीतील जनता नाट्यगृहाकडे निघालेली ! जयराम म्हणजे रंगभूमीच्या संसारातील हाताशी आलेला कर्ता मुलगा – ” सिंहासन “, “सर्वसाक्षी ” आणि “२२ जून ” मधून आकर्षण केंद्र बनलेला, तर शांताबाई (जोग) म्हणजे घरातला मायेचा वृद्ध वृक्ष !

धावतपळत गेलो तरी नाटक सुरु होऊन गेलेलं . आम्ही प्रेक्षागृहाच्या दारात आणि जयराम रंगमंचावरील दारात !
पहिलंच दर्शन हाताला कायमचा सुगंध जडवून गेलं.

मध्यंतरात त्याला भेटलो, सही घेतली. बोलता बोलता नकळत त्याने प्रेमाने मारलेली थाप अंगभर भिनवून घेतली.

५ एप्रिलची दुपार – अपघाताची आणि जयराम/शांताबाईंच्या मृत्यूची वार्ता आली.

दुसऱ्या दिवशी माझी व जयरामची – म्हणजे कोळशाच्या ढिगाची वृत्तपत्रातून अखेरची भेट झाली.

शक्य असूनही मी अपघातस्थळी (कामेरीला ) गेलो नाही. तो ढीग माझ्या पाठीवर थाप मारणार नव्हता. समिंद्रा / पूर्णिमा पाटीलचा निरोप घेणार नव्हता, टॉम अल्टरला चाफेकर बंधूंची माहिती देणार नव्हता. स्मिता पाटीलशी नजरेची जुगलबंदी करणार नव्हता.

जयंताला रडताना मी पहिल्यांदाच पाहिलं. एकदा त्याच्याशी लावलेली पैज अनाहूतपणे आठवली – ” एकदा तुला रडताना पाहायचंय.”
“शक्य नाही. या इंजिनिअरिंग च्या चार वर्षात मी तुला कधीच रडताना दिसणार नाही.”

पण जयरामचा अकाली मृत्यू त्यालाही भिजवून गेला होता. त्याच्या अश्रूंच्या थेंबातून जयराम मला खिजवत होता. ही हार कोणाची?

नंतर जयंताने सांगितले – ” आमचे भाऊसाहेब ( निवृत्त प्राचार्य असनारे ) नेहमी म्हणतात ”

” आयुष्याची पैज जिंकणाऱ्याचा गौरव, परमेश्वर त्याच्या अकाली मृत्यूने करतो.”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..