नवीन लेखन...

आपल्या हृदयाची काळजी कशी घ्याल

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=ovAaQY92YMU[/embedyt]

आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि नवीन नोटिफिकेशनसाठी Bell आयकॉनवर क्लीक करा.
हृदय शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव. विशिष्ट मांसाने बनलेला. त्याला शुद्ध रक्तपुरवठा करणारे स्वत:चे जाळे असते. या रक्तवाहिन्यांच्या जाळय़ामधून हृदयास साखर, प्राणवायू व इतर आवश्यक घटक प्रत्येक भागात पोहोचतात. ज्या वेळी या रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होते किंवा पूर्णपणे बंद होते त्या वेळी हृदयाच्या इतर भागात शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही व हृदयाघात घडतो.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात व्यायाम करण्याचा सल्ला आवर्जून पाळला पाहिजे. मात्र, काही जण प्रचंड शारीरिक ऊर्जा गरजेची असलेल्या वैविध्यपूर्ण क्रीडाप्रकारांत सहभागी असतात. गरज नसताना अतिरिक्त व्यायामही करतात. या व्यायामप्रकारांत ऊर्जा, वेग, उंची यांसारखे घटक समाविष्ट असतात. अशा व्यक्तींनी त्यांच्या हृदयाची काळजी घ्यायला हवी.

रक्तपुरवठा काही सेकंद कमी पडला आणि परत चालू झाला तर हृदयाच्या जागी नुसती वेदना जाणवते. ही वेदना अगदी खोल घुसणारी, प्रचंड दाब असल्यासारखी जाणवते. या वेदनेला आपण हृदयवेदना असे म्हणू या. ही अगदी तीव्र कळ असते. या’हृदयवेदनेची’ विशिष्ट जागा, स्वरूप यांवरून ती ओळखता येते. या अवस्थेत रुग्णाला योग्य उपचार व विश्रांती मिळाल्यास पुढचे नुकसान थोडे तरी टळू शकते.

एकदा हृदयविकार झाला, की त्याचे परिणाम व पुढचे सर्व उपचार अत्यंत अवघड असतात. कधी रक्तवाहिन्या इतक्या निकामी होतात, की रक्तवाहिन्यांवर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून रक्ताला नवीन वाट करून देणे किंवा आतली चरबी खरवडून काढणे हेच उपाय उरतात. याशिवाय परत हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून सतत गोळया घेत राहावे लागते.

आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण स्वत:ला जास्तीत जास्त क्षमतेपर्यंत रेटतो; परंतु आपले शरीर हे बदल कसे स्वीकारेल याची कल्पना नसल्यामुळे अनेकदा लोकांना आरोग्याच्या काही समस्यांना तोंड द्यावे लागते. अतिरिक्त ताण देणाऱ्या व्यायामामुळे काही प्रसंगी हृदयाला धोका निर्माण होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

Sanket

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..