नवीन लेखन...

हिंदोळा

दिवस तुझे आलेरे आतां,
बाळा, दिवस तुझे आले रे. आतां,
झोपाळ्यावरी झुलायचे ।
झुलतां, झुलतां,
स्मृतींना सार्‍या स्मरायचे ।।धृ।।

बाल्य बाळाचे, सरले सारे सिन्नर ग्रामीं,
साधल्या सार्‍या, संधी-सुवर्ण, तेथेही नामी ।
वाणीनं लघवी, सकलां जवळ केले,
साथींत तयाच्या, मनीं, चांदणं फुले ।।
दिन कष्टाचे ते, सरले आतां,
आले क्षण, हसत-खेळत रमायचे ।।१।।

केलास तू, आटा-नि-पिटा, सार्‍या जिवाचा,
मार्ग शोधला, कष्टुनिया, चिरसौख्याचा ।
“मंगल”, मांगल्य, उभ्या जीवनीं लाभतां,
अमंगल सारे, दूर, दूर ते सरती ।।
शल्य हृदयी, न कसले आतां,
घेऊनि घटिका आल्या, क्षण सुखाचे ।।२।।

प्रेमभरे, विचारपूस, सार्‍यांची करुनि,
दिसा नि रातीं, मदतीसाठी, जाई धांवुनि ।
सकलांशी तो, अपुलाच “बाळ” वाटला,
हृदय-कोंदणी, हिरो कायम ठसला ।।
मार्ग श्रमांचा तो, सरला आतां,
आले दिनहे, हलके खिळायचे ।।३।।

गंध-गुलाब, येथे लाविले,
आप्त, तोषिले मनीं, अतुल-परिमळे ।
लाभो बाळां या आयु शतका शतकांचे,
बोल ठरविले खरे, या दास-गुरुचे ।।
काळ कांळा, बाळा, सरला आतां,
उरले दिन, सौख्य-सागरी डुंबायचे ।।४।।

-गुरुदास / सुरेश नाईक
१ डिसेंबर २००८
२०, काशिनाथ, घंटाळी, ठाणे

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..