नवीन लेखन...

दोन मृत्यू: एक व्यक्तीचा, एक हुद्याचा

बड्या धेंड्याचा देहान्त जाहला,
राजकारणी खुर्च्याचा त्राता निवर्तला,
जनसागर अवघा शोकसागरात बुडाला
अश्रूंचा (कोरड्या) अन् पूर लोटला
का कोण जाणे कुणास कसला
पत्ताच नव्हता शोक कशाला?
शोकग्रस्त जीवांनी गच्च भरले
तरीही राजमहाल अपुरे पडले
हार वाहिले, पुष्पचक्र अर्पिले
तरी बरेच काहीसे अजूनी उरले

एकाकी तू असा निजलास का रे
कुणी न तुजला वारस का रे
शोक न कुणाचा, पाठिंब्याचा
हुद्याचा वा मुद्याचा
एकही न कसले फूल बिचारे
तुजवर पडले; काय अरेरे!!

अहा रे त्याचे जीवनही प्यारे, मरणही न्यारे
तूच अभागी मग असा कसा रे
तुला सजविले, मरणही बिचारे
प्रमाद एकच घडला तवहाती रे
असशील वेचले, देशासाठी प्राणा रे
कधी न इच्छिलेस तू अभाग्या
मोल तुझे अधिकार हुद्यात रे

हो जागाही नगण्य तुझ्या चिरनिद्रेतून
हसतमुखाने; आश्चर्य लपवून
हो सामील या मिरवणुकीत
जबरदस्तीच्या तीनतेराच्या दुखवट्यात
हा दोष न कुणाच्या माथी रे
देश अपुला हुद्दासत्ताक रे

तुला न मिळावा हा मान उपेक्षिता
फुका खपलास भूमिसाठी या करंट्या
जरी न केले त्याने काही देशासाठी रे
हुद्दा त्याचा होता फार मोठा रे
असता जर तो तुझ्याही जवळी
तो मान मग तुलाही मिळता रे
अनमोल तुझ्या कार्यापेक्षा
होता विचार हुद्याचा तुझ्या रे
हुद्याचा तो मान वेड्या रे
तुझा न् माझा नव्हता रे

घडले दोन मृत्यू: मात्र एक फरकाचा
होता एक व्यक्तीचा दुसरा मात्र हुद्याचा

-यतीन सामंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..