नवीन लेखन...

चीन इन मिन तीन

दि. 16 जून ला चिनी सैनिक dolkamm पठारावर भूतान आणि भारतीय सीमेच्या बाजूने आक्रमण करीत असलेले व त्यांना आपले सैन्य हातानेच थांबवत असल्याचे videos मीडिया वर सध्या झळकताहेत. दोन देशातील मोठे नेते गळाभेट घेत असताना चिनी राजकर्त्यांना हे असले विश्वसघातकी वागणे कसे सुचते असा प्रश्न माझ्यासारख्या अनेक सामान्यांना पडतो? आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल सामान्य लोकांना त्यातून भारतातील तर खरेच फार काही माहिती नसते त्यामुळे आपण बऱ्याच वेळा अज्ञानात सुख मानतो आणि सुखी राहतो.चीन च्या अश्या वागण्याला काही महत्वाची कारणे आहेत त्यातून या प्रश्नाचे उत्तर मिळते. एक सध्या चीन निर्माण करत असलेल्या पाकीस्थान च्या बंदराला जोडणारा इकॉनॉमिक कॉरिडॉर ला बलुचिस्थानात होणारा प्रचंड विरोध यामुळे चीन चे युरोप शी व इतर जगाशी जोडले जाण्याचे स्वप्न भंग पावण्याची शक्यता आहे. जवळच्याच सिकीयांग प्रांतात चीन ला मुस्लिम आंतकवादाची डोकेदुखी आहेच त्यात बलुचिस्थान मधील विरोधाने त्याच्या डोक्याचा ताप वाढला आहे. हे सगळे भारत घडवत असावा असाही एक संशय चीन पाकिस्थान ला आहे. त्याला कारणही तसेच आहे कारण बलुचिस्थानिय नेत्यांनी भारताकडे मदत मागितली आहेच. आंतराष्ट्रीय राजकारणात चीन एकटा पडतो आहे फक्त पाकिस्थान व नॉर्थ कोरिया हे दोन रोगीस्ट विकृत आंतकवादाच्या उन्मादाने पछाडलेले इन मिन तीन त्यात चिनही आलाच राष्ट्रे सोडली तर आता चीन ला म्हणावा असा मोठा दोस्त कुणीही नाही. सध्या चीन देखील आर्थिक मंदीतून जातो आहे आणि आपण जर चिनी वस्तुवरील आपले अज्ञानी भाबडे प्रेम कमी केले तर चिनी सैन्याला रोजच्या खर्चाची मिळवणी करणेही कठीण जाणार आहे. याबाबत जपान चे एक उदाहरण डोळ्यासामोर ठेवण्यास हरकत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान वर बरेच प्रतिबंध लादल्या गेले होते अमेरिकेने तर आमचीच फळे विकत असाही बडगा उगारला त्यावेळी नाईलाज म्हणून जपानी सरकारला अमेरिकन संत्री जी सर्वार्थाने उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण होती ती आयात करावी लागली. स्वाभिमानी जपानी जनतेने मात्र ती फळे विकत घेण्याचे नाकारले आणि स्वतःची कडवट असलेली कमी गुणवत्तेची संत्री मात्र स्वतःच्या मातृभूमीच्या प्रेमापोटी आनंदाने खाल्लीत परिणामी अमेरिकन संत्री खराब होऊन फेकून द्यावी लागलीत आणि अमेरिकेला परत हा दबाव निर्माण करता आला नाही. यातुन आपण बरेच शिकण्यासारखे आहे. पंडित नेहरूंच्या अति आसक्तीपूर्ण,बावळट स्वयंप्रतिमेच्या जागतिक नेता होण्याच्या अनिवार विकृत प्रेमाने 1962 च्या युद्धात आपण बरेच काही गमावले पण आता तशी स्थिती नाही. आपण चीन शी तुलनात्मक दृष्ट्या त्यावेळ पेक्षा सामरिक तंत्रज्ञान दृष्ट्या बरेच प्रगत आहोत पण मूलभूत सोयी सुविधांपेक्षा बरेच मागे. मी स्वतः 2006 ला प्रत्यक्ष बघितलेला चीन हा flyover, रस्ते, रेल्वे,sealink bridges यामध्ये त्यावेळी आपल्यापेक्षा किमान 25-30 वर्षे पुढे होता हि प्रगती त्यांनी आता तिबेट ला आपल्याला लागून असलेल्या सीमे पर्यंत,अरुणचलच्या,सिक्कीमच्या सीमे जवळ अगदी योडांग पर्यन्त आणून ठेवली आहे, त्यामुळे त्यांना सैन्याची,सामुग्रीची हालचाल करणे अगदी सहज,सोपे झाले आहे. आपल्या मागील नालायक सरकारने याचा कधी विचारच केलेला नाहीये. सुदैवाने आपले सध्याचे सरकार जागरूक दिसतेय आणि आपली भाषा ही कणखर aggressive आहे. काल परवाच्या बातमी मध्ये आपले जुने दोन बंकर चिनी सैन्याने उध्वस्त केल्याचे आवर्जून सांगितले जात असतानाच अरुणाचल मध्ये आपले सैन्य 3 km पुढे सरकल्याचे व त्यांचे सहा बंकर आपण उध्वस्त केल्याचे मात्र मोघम ठेवले जात होते. सरकारने असेच असायला हवे बोलणे कमी काम जास्त. त्याबरोबरच आपणही जपानी जनतेचा गुण घ्यावयास हवा फुकट बाता कमी आणि गुणवत्तापूर्ण कार्य जास्त. Whtasapp वरून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या गप्पा या बाष्कळ,पांचट,कृतिशून्य नकोत तर त्या राष्ट्रप्रेमाने कृतीपूर्ण, परिणाम दिसणाऱ्या असाव्यात हि अपेक्षा आहे!यात अज्ञान,बावळटपणा,चलता है अश्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. कारण मागच्या वर्षी नथुला पास ला गेलो असताना चीन तर्फ़े आपल्या कडे येणाऱ्या व आपल्या कडून त्यांच्या कडे असणाऱ्या मालाचे अति व्यस्त प्रमाण मी जेव्हा याबद्दल मुद्दाम आपल्या सैनिकाकडून माहिती घेतली तेंव्हा कळले. हे प्रमाण तुम्ही ऐकलं तर चकित व्हाल आपल्याकडून दिवसाला 8-9 ट्रक जातात तेव्हा त्यांच्याकडून 138-139 ट्रक आलेले असतात म्हणजे आपण 6-7 % सुद्धा माल पाठवीत नाही पण त्यांचा 17-18 पट माल आपल्याकडे शिरलेला असतो आहे ना डोळ्यात अंजन घालून घेण्यासारखी परिस्थिती? आणखी एक करा स्वस्त म्हणून दार्जिलिंग ,सिक्कीम येथे स्वस्त म्हणून चिनी मालाची खरेदी चुकूनही करू नका आपल्या कडे बनलेल्या मालाची मागणी करून तपासूनच तो खरेदी करा. तेव्हा खरी राष्ट्रभक्ती असेल तर एक सामान्य माणूस म्हणून आपण आपल्यापुरते व आपल्या ओळखीत सर्वांनाच चीन मधील मालाच वापर करण्यास थांबवूया! नक्की ना मित्रानो?

श्रीराम जोशी
दि 2 जूलै 2017

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..