नियती अनेक गाेष्टी घडवून आणते. तिघेही केंद्रात असते तर त्यांच्या निधनाचे हे धक्के सरकारसाठी सुरळीत कामकाजाच्या दृष्टीने समस्या हाेऊ शकले असते. पर्याय शाेधताना आणि गाडे रुळावर आणताना त्रास झाला असता. कुठल्या अंतस्थ शक्तीने त्यांना राेखले, हे परमेश्वर जाणाे. पण आपल्यामुळे देशाचे नुकसान हाेता कामा नये, याचा आदर्शपाठ या तिघांनीही घालून दिला. ताे नव्या पिढ्यांसाठी अनुकरणीय ठरेल. […]
मुळात आयुष्य म्हणजे जगणं असतं का? आता हा फार जटील, गुंतागुंतीचा प्रश्न असला तरी हे जीवन जटील नाहीच. मग का आपण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच हरवून बसतो? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत… त्यांचं वैभव, त्यांची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो..? […]
‘नाती’ एक छोटासा शब्द. पण त्यात जगातला प्रत्येक माणूस सामावला जातो. आयुष्यात आल्यावर माणसाला प्रत्येक गोष्ट कळते अगदी माया, ममता, समता आणि बंधुता सुद्धा कळते. कोणत्याही नात्याच्या गाठी ह्या आधीपासूनच बांधलेल्या असतात. रक्ताने बांधला जाणारा कदाचित एखादाच असतो, पण मैत्री आणि प्रेम या दोन धाग्याने गुंफला जाणारा वर्ग मात्र मोठा असतो. […]
“प्रेम” या शब्दाचा इतका गैरवापर केला गेला आहे की प्रत्येक चरणावर या प्रश्नांबद्दल प्रश्न उठविले जातात. प्रेमाची तुलना वारंवार वासनाशी केली जाते. प्रेमाची तुलना मैत्री म्हणजे पक्की मैत्रीशी ही केली जाते. जर हे खरे प्रेम असेल तर ते कसे असेल..? […]
आज प्रत्येकजण स्वप्नांच्या मागेे धावतोय. स्वप्नं, इच्छा, अपेक्षा इ. ची न संपणारी यादी..! आपण इतकं धावतो, इतकं धावतो की आजूबाजूला पहातचं नाही. स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसागणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत (कडू असो की गोड). एक स्वप्न पूर्ण झालं की, दुसर्या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य..? […]
आजकालचे नाते-संबंध अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत. यातून घटस्फोटाला प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी प्रामुख्याने व्यभिचार, सुसंवादाचा अभाव, अवास्तवी अपेक्षा, समानतेचा अभाव, कौटुंबिक हिंसा, आर्थिक समस्या, राग, संताप, भावनिक जवळीकतेचे अभाव इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. याव्यतिरिक्त मानसिक आजार आणि हिंसक प्रवृत्ती घटस्फोटासाठी प्रवृत्त करते. […]
बालपणी शब्द आणि धन हे समीकरण सहसा मनाला पटायचंच नाही. हे कसचं धन..? शब्दांनी का आपल्याला एखादी वस्तू मिळते..? का हौसमौज होते..? यासाठी तर खण खण वाजणारा पैसाच हवा ना. त्यावेळी शब्द, रत्न आणि धन याचा मेळ लागता लागत नसे. […]
मित्रभाव ही माणसामाणसांमधली सर्वात सुंदर भावना आहे… आपुलकी, विश्वास, प्रेम आणि सुरक्षितता जागवणारी… सर्वांनाच कधी न कधी एकटेपणा जाणवतो. आणि प्रसिद्ध लोकही यातून सूटलेले नाहीत. त्यांच्या अवतीभोवती सतत लोक असतात पण ते त्यांचे खरे मित्र नसतात. […]