कोरोना रोगामुळे आलेल्या आरोग्य आणीबाणीमुळे जगातील वेगवेगळ्या समाजांमध्ये रोग आणि भीतीही शिरकाव करते आहे. ही भीती अनेकदा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही भयंकर असते आणि हीच भीती माणसाच्या हातून चुका घडवून आणते आणि सोबतच कोण आपले आणि कोण परके हे पण शिकवून देते. […]
आयपीएल अर्थात इंडियन प्रिमियर लीगला सुरूवातीला खूप वाहवा मिळाली. पण, ललित मोदी आणि शशी थरूर यांच्यातील वादानंतर आयपीएलचे खरे स्वरूप लोकांसमोर आली. त्या आधी आयपीएलकडे व्यवस्थापन विद्यार्थ्यासाठी आदर्शभूत मॉडेल म्हणून पाहिले जाऊ लागले होते. पण, भ्रष्टाचाराच्या आगीत या व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ झाला. […]
वडील, या शब्दात सगळ काही सामावलेले असते. ते कसे बघुया. वडील म्हणजे आधार. प्रत्येक व्यक्तीला जीवनात आधाराची गरज असतेच आणि जर त्या वेळेस त्या व्यक्तीला त्याच्या वडिलांचा आधार भेटला तर तो पूर्ण जग जिंकू शकतो. बाप हा त्याचा मुलाला जन्म देण्या पासून ते त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला यश कस प्राप्त होईल ते बघत असतो. मुलं पण जर स्वतःच्या बापाचे कष्ट समजून घेणारे असतील तर बाप नक्कीच यशस्वी होतो. […]
या फेसबुक आणि व्हाट्सअपमध्ये पब्लिक फारच गुंतलेय असं तुम्हाला वाटतं ना? मलाही तसंच वाटतं.’ नुसतं वाटून काय उपयोग काहीतरी करायला पाहिजे!’ असं भाषणात म्हणतात ना ते खरच आहे. मग ठरवलं या सगळ्या दोस्ताना फेसबुक व्हाट्सअप वरून उठवायचं आणि चांगले गेट-टुगेदर करायचं. दोस्तांचा ग्रुप परत जमवायचा. लागलो कामाला. पक्या, दिल्या, उम्या, सूर्या टाकले मेसेज व्हाट्सअप वर एकेकाला. […]
सर्वसाधारणपणे अपेक्षांच्या भोवतीच जीवन फिरत असते. बहुतेंक अपयश वा समस्या या अपेक्षांचा ताळमेळ नीट न जुळल्यामुळे निर्माण होतात. बऱ्याच अपेक्षा या स्वयंपुर्ण राहिल्यास आटोक्यात राखता येतात. दुसऱ्या संबंधीत असलेल्या अपेक्षांची टक्केवारी तर अगदी नगण्य आहें. यात आई, वडील, नवरा, बायको, मुलेे, इतर नातेवाईक, मित्र, सामाजिक इत्यादींशी संबंध येतो. […]
काही लोकांना त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या पदाचा, दिसण्याचा किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थीतीचा ॲटीट्युड असतो ज्यातून त्यांची वृत्ती किंवा त्यांचा दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसून येतो ज्यामुळे अशी लोकं आपल्या आयुष्यात पुन्हा येऊच नयेत असं मला वाटायचं. शेवटी जिद्द आणि चिकाटी सोबतच कोणाच्या ॲटीट्युडला कशासाठी आणि किती महत्व द्यायचे हे तर आपल्याच हातात आहे. […]
संकल्प सिद्धीस जात नाही , अपूर्ण सोडावा लागतो म्हणून संकल्पच करायचा नाही असं मुळीच नाही . कारण त्यामुळे आपण विचार करतो , कृती करतो. सातत्य आणि नियमितपणा आपल्या अंगी बाणविला जातो , त्यातूनच आयुष्याला एक शिस्त , वळण लागते. संकल्प हे आश्वासन नाही. संकल्प म्हणजे कृतीमागची ‘प्रेरक’ शक्ती. माणसाच्या आयुष्यातील, संकल्प हा स्वनांकडून सत्याकडे नेणारा पूल आहे. […]
आजच आपण पोस्टात फिरकत नाही. पण २०२५ मध्ये पोस्ट ऑफिस अस्तित्वात नसल्याचीही आपल्याला सवय झाली असेल. बँकांचे बरेच व्यवहार ऑनलाईन होत आहेत. आगामी काळात तर धनादेशही इतिहासजमा होतील. ब्रिटनमध्ये २०१८ पर्यंत धनादेशांचा वापर बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. […]