आपली अमेरिकेशी मैत्री कितीही घनिष्ठ झाली, तरी अलिप्त राष्ट्र चळवळीचे (नाम) महत्त्व त्यामुळे अजिबात कमी होणार नाही. कारण हीच चळवळ भारताला परराष्ट्र व संरक्षण धोरणात निर्णयस्वातंत्र्याची क्षमता प्राप्त करून देईल. जागतिक गट, निरपेक्ष आंदोलन ही संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेनंतरची सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
आसाम दंगल आणि त्यानंतर देशाच्या अनेक राज्यांतून ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांचा आपल्या गावांकडे निघालेला लोंढा याला जबाबदार असेलेल्या एसएमएस आणि एमएमएसचे मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे भारताचे आरोप २० औगस्टला पाकिस्तानने नाकारले आहेत.
आसामातील हिंसाचाराचे पडसाद देशाच्या अन्य भागांत उमटल्यानंतर, ईशान्य भारतीयांचे जिवाच्या भीतीने पलायन सुरू झाले. अशातच १९ ऑगस्टला बंगळुरूहून गुवाहाटी एक्स्प्रेसने आसामकडे निघालेल्या नऊ आसामी नागरिकांना, अज्ञात समाजकंटकांनी बेदम मारहाण करून लुटले आणि नंतर धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या मारहाणीत अन्य सात जण गंभीर जखमी झाले. या देशाला गृहमंत्री आहे, ही एक अफवाच ठरल्याने लोकांनी जीव वाचविण्यासाठी माघारी परतण्याची धावपळ सुरू केली होती. […]
भारतीय राजकारणात कौटिल्याच्या कुटनीतीचा अभ्यास करणारे मुसद्दी आणि अर्थशास्त्राचे विचारवंत असतांना असे आतताई निर्णय भारत सरकार घेऊच कसे शकते ह्याचेच आश्चर्य आणि कुतूहल वाटते! भारताला नुसती अश्यावासने द्यायची, खोटे बोलायचे, विश्वासघात करायचा, पाठीत खंजीर खुपसायचा, वेळ पडल्यास छुपे युद्ध करायचे, आणि वर ‘गिरा तोभी टांग उपर’ असे वागायचे आणि आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यावयाच्या याचे हे बोलके उदाहरण आहे. […]
आसाममध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात 31 जणांचा बळी गेला आहे. जातीय दंगलीचा वणवा 500 गावांत पसरला असून कोक्राझार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 23 जुलैपासून आसाममध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोक्राझार जिल्ह्याला या दंगलीचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोक्राझारमध्ये समाजकंटकांना पाहताक्षणी गोळया घालण्याचे आदेश तसेच अनिश्चितकालीन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. […]
ठाणे शहराचे महापालिका आयुक्त आर ए राजीव यांनी ठाणे खाडी किनाऱ्याच्या पूर्वेला १०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात नवीन शहर बसवण्याचा निर्णय नुकताच जाहिर केला. या निर्णयाबाबत ज्येष्ठ पत्रकार श्री संदीप प्रधान यांनी आयुक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी बातमी लिहिली. ही बातमी सोशल नेटवर्कींगच्या आणि इ-मेल्सच्या माध्यमातून शेकडो वाचकांपर्यंत पोहोचली. मराठीसृष्टीच्या वाचकांनाही ही माहिती विनासायास मिळावी या एकाच हेतूने ही बातमी येथे पुनर्प्रकाशित करत आहोत. […]
बेळगाव महानगरपालिका बरखास्त करण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा घडवून आणू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. […]
लष्कर-सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांचा बंदोबस्त केल्यामुळे, काश्मीर खोर्यात शांतता आणि निर्भयतेचे वातावरण आहे. परिणामी यावर्षी भूलोकीचे हे नंदनवन परदेशी आणि देशातल्या पर्यटकांनी गजबजले आहे. राजधानी श्रीनगरमध्ये हजारो स्त्री-पुरुष पर्यटक रात्री उशिरापर्यंत शहरातून फेरफटका मारतात. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने राज्याच्या पर्यटन उद्योगालाही चांगले दिवस आले आहेत. हजारो काश्मिरी नागरिकांना रोजगारही मिळाला. […]
फक्त भारतात एक विशेष अपवाद आहे ते म्हणजे कोणत्याही राजकीय व्यक्तीला कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही राजकारणात उतरण्यासाठी. तरी ही राजकीय मंडळी जर निवडून आली तर ते जनतेसाठी नियम व कायदे संसदेत बनविणार […]
मंत्रालयाला लागलेल्या आगीत सरकारची आपत्कालीन संरक्षण यंत्रणा भस्मसात झाली. आणीबाणीच्या प्रसंगी ज्या यंत्रणेवर विसंबून राहावे, तीच आपत्तीची बळी ठरत असेल, तर मुळातच कुठेतरी भयंकर चूक होत असल्याचे मान्य करावे लागेल. हा संदर्भ केवळ मंत्रालयाच्या आगीपुरता मर्यादित नाही. या सरकारच्या धोरणाने संपूर्ण राज्य आणि त्यातही गरीब शेतकरी वर्ग अगदी नेमाने संकटाच्या आगीत होरपळत असतो. त्यातही विदर्भातील शेतकर्यांची दैना अधिकच अस्वस्थ करणारी आहे. सरकारने आपले अर्धे मंत्रालय नागपूरला हलविले, तर किमान या शेतकर्यांना हे सरकार आपल्यासाठी काही करू इच्छिते याचे समाधान तरी लाभेल. […]