नवीन लेखन...

घातल्या पाण्याने गंगा वाहत नसते!

परवा नागपुरात राज्याचे उद्योगमंत्री पतंगराव कदम यांनी लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या तीन वर्षातील कामगिरीचा आढावा घेतांना लोभस आकड्यांचा खेळ सादर करीत महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात अद्यापही देशात नंबर वन असल्याचे सांगितले. महाराष्ट्राची ही औद्योगिक प्रगती(?) भविष्यातही कायम ठेवण्याच्या उद्देशाने आणि विशेषत: मागासलेल्या विदर्भासाठी त्यांनी काही योजना देखील जाहीर केल्या.
[…]

आणखी एक इशारा!

नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे.
[…]

वाट, वाटसरू आणि वाटाडे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे जे अनेक भाग झाले आहेत त्यापैकी दोन भागांचे शक्तिप्रदर्शन विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात पार पडले. शक्तिप्रदर्शनापूर्वी उभय गटातील वाद एवढा विकोपास गेला होता की संघर्षाची ठिणगी पडते की काय, असे वाटायला लागले होते.
[…]

मूर्ख आणि शहाणे! शिका!

समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्‍या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते.
[…]

जरा आजूबाजूला बघायला शिका!

बायबलमध्ये एक बोधकथा आहे. येशू ख्रिस्त फिरत-फिरत एका गावात आले. त्यावेळी त्यांना दिसले की गावातील सगळेच लोकं एका मैदानात जमले आहेत. प्रत्येकाच्या हातात दगड आहे आणि मैदानाच्या मध्यभागी एका खांबाला बांधलेल्या स्त्रीला ते दगडांनी ठेचून मारणार आहेत. त्या स्त्रीचा अपराध कोणता, याची चौकशी केल्यावर येशू ख्रिस्तांना सांगण्यात आले की, ही स्त्री व्यभिचारी आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिला दगडांनी ठेचून मारण्यात येणार आहे.
[…]

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत मानवाला अधिक बुध्दिमत्तेचे वरदान लाभले आहे. या अत्त्याधिक (?) बुध्दीचा वापर करून मानवाने आपले भौतिक, भावनिक, मानसिक जीवन समृध्द करण्यासाठी अनेक शास्त्रांना जन्म दिला. चौसष्ट कलांची चौसष्ट शास्त्र निर्माण झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये.
[…]

खाण तशी माती

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. बीज जर शुद्ध असेल तर त्यापासून तयार

होणाऱ्या झाडाला लागणारी फळे रसरशीत, कसदार आणि अवीट चवीचीच असणार. मात्र मुळात बीजच अशुद्ध असेल तर फळेही

निकस आणि निकृष्टच निपजणार. हा न्याय केवळ वनस्पतीसृष्टीलाच लागू आहे, असे नाही.
[…]

सज्जनांची तटस्थता

आज संपूर्ण जग हे समस्यांचे माहेरघर झालेले आहे. एकजात सर्वांनी होकारार्थी माना डोलवाव्यात असेच हे वाक्य आहे आणि सर्वांच्या माना डोलतातसुध्दा. परंतु केवळ माना डोलावण्याने काय साध्य होणार? समस्या उद्भवणे आणि त्यांचे निराकरण हे जगाचे रहाटगाडगे चालू राहण्याचे एक प्रमुख कारण आहे.
[…]

नोकरशाहीचे उफराटे सल्ले

प्रगतीचा एकेक टप्पा गाठणार्‍या आदिमानवाने हजारो वर्षांपूर्वी चाकाचा शोध लावला. चाकाचा शोध लागल्यानंतर मानवाच्या प्रगतीची गती अधिकच वाढली. चाक आले आणि चाकापाठोपाठ गाडे आले, पुढे-पुढे चाकाचे महत्त्व अतिशय वाढले. आज तर

परिस्थिती अशी आहे की, चाकाचा उल्लेख केल्याशिवाय आमचे कोणतेच गाडे पुढे सरकू शकत नाही.
[…]

हे हलाहल आम्ही पचवू शकणार नाही

हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणार्‍या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे. […]

1 41 42 43 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..