नवीन लेखन...

मराठी आणि महाराष्ट्राविषयक बातम्या आणि घडामोडी…

महाराष्ट्र शासनाचं शिक्षण क्षेत्रातलं सकारात्मक पाऊल..

दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या जोडीला आता राज्याच्या शिक्षण विभागाचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळही स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचं शिक्षण मंडळ अर्थात एसएससी, एचएससी, केंद्रीय शिक्षण मंडळाचं सीबीएससी यांबरोबरच आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी या प्रमुख शिक्षण मंडळांच्या जोडीला आता ‘एमआयईबी’, म्हणजेच महाराष्ट आंतरराष्टीय शिक्षण मंडळाची भर पडणार आहे. […]

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ – वाचन आणि चर्चा

“बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या” ही उदगिरी बोलीभाषेतील प्रसाद कुमठेकर यांची आगळी वेगळी कादंबरी. गाव जीवनाचा थांग शोधणाऱ्या या कादंबरीचे ‘वाचन आणि चर्चा’ असा कार्यक्रम २० जानेवारी २०१८ रोजी पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे पार प्रकाशन द्वारा आयोजित केला गेला. […]

व्यंगचित्रकारांना असुरक्षित वाटेल अशी आजची परिस्थिती

आम्ही व्यंगचित्रकार खरंतर `अल्पसंख्यांक’च! १३२ कोटीच्या देशात जेमतेम १४० व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत. मराठी व्यंगचित्रकारांची प्रतिभा, विनोदबुद्धी, कल्पकता वाखाणण्यासारखी असूनही आजकालच्या माध्यमांच्या रेट्यामुळे ही कलाच लुप्त होईल की काय ? अशी भीती वाटू लागली आहे. […]

बुलेट ट्रेन : महाराष्ट्राला फायदा काय ?

दि.१४ सप्टेंबर २०१७ रोजी गुजरातमध्ये साबरमतीजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मध्ये महाराष्ट्राचा नक्की काय फायदा होणार आहे…? महाराष्ट्रातील उद्योजक आणि शासनाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधून हा ट्रॅक सुरु होईल. महाराष्ट्रात ४ तर गुजरात मध्ये ८ स्टेशन्स घेत बुलेट ट्रेन […]

परळला गेलेले दसर्‍याचे नरबळी

पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या एल्फिन्स्टनला जोडणाऱ्या पुलावर आज अपघात झाला. असा काही अपघात झाला, की ‘दुर्दैवी’ म्हणतो, फेसबुकवरच श्रद्धांजली वैगेरे वाहतो आणि पुढच्या मिनिटाला सर्व विसरून आपल्या कामाला लागतो. असं काही घडलं, की आपल्याला पुन्हा काही वेळासाठी जाग येते, ती थेट पुढच्या अपघाताच्या वेळेसच. पुढचा अपघात आताच सांगून ठेवतो, मध्य रेल्वेवरचा ‘करी रोड’ स्थानकाची जागा. […]

बंद होणार “टाटा समूहाची” कंपनी “टाटा टेलिसर्व्हिसेस” ?

आजच्या इतिहासात १४९ वर्षांत पहिल्यांदाच बंद होणार “टाटा समूहाची” कंपनी “टाटा टेलिसर्व्हिसेस”..? विश्वासाचं दुसरं नाव म्हणून देश ज्या उद्योगसमूहाकडे बघतो, त्या “टाटा” समूहातील एक कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. दूरसंचार क्षेत्रातील ” टाटा टेलिसर्व्हिसेस / Tata Teleservices” या कंपनीला अपेक्षित यश मिळत नसल्यानं ती बंद करण्याचा विचार व्यवस्थापन करतंय. तसं झाल्यास, टाटा समूहाच्या १४९ वर्षांच्या […]

‘अदृश्य’ रूळांवर धावणारी रेल्वे चीनकडून सादर

चीन लवकरच एक अशी रेल्वे सुरू करणार आहे, जी रूळांशिवायच धावेल. ही रेल्वे अदृश्य रूळांवरून मार्गक्रमण करणार आहे. चीनमध्ये व्हर्च्युअल रेल्वे ट्रकवर धावणाऱया या नव्या प्रकारच्या रेल्वेचे पहिले दृश्य दाखविण्यात आले आहे. चीनच्या या सेवेचे नाव ऑटोनॉमस रॅपिड ट्रान्झिट (एआरटी) ठेवण्यात आले आहे. ही रेल्वे 30 मीटर लांब असून यात असे सेन्सर बसविण्यात आले आहेत, जे रस्त्याची लांबी-रुंदी आणि विस्तार स्वतःच जाणून घेतील. या सेन्सरच्या मदतीने रेल्वे विनाधातूच्या रूळांवरील आपल्याच मार्गावर धावणार आहे. […]

द “बर्निंग” ट्रेन

ही पोस्ट बुलेट ट्रेन हवी का नको या चर्चेसाठी नाही.ती आताच का , बुलेट ट्रेन ऐवजी हे करा, ते का नाही करत या फंदात मला पडायचे नाही. हे मतप्रदर्शन नाही तर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट नक्की काय आहे त्याबद्दल फक्त माहिती देत आहे !! काल काही चॅनेल्सवर सुद्धा हे सांगितले. नेटवर सुद्धा माहिती उपलब्ध आहे. […]

अतिवृष्टी आणि “मुंबईकर”….!

पावसाने एका झटक्यात सगळ्यांना ‘मुंबईकर’ बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही.! भिजणारी माणसेच.., मदत मागणारी माणसेच..आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसेच.! उद्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल. फक्त एक करा. ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा.! शेजाऱ्यांची सुद्धा निटशी ओळख नसणार्या मुंबईकरांच्या घराचे दरवाजे आज अनोळखी लोकांसाठी उघडे आहेत. संकटात मदतीला धावून जाण्याच्या या वृत्तीला माझा सलामच…! […]

अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला; तेजोभंगाचा एक मार्ग

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यावरून मला, का कोण जाणे, पण यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन उर्फ गझनीच्या महमूदाने सोमनाथावर केलेल्या हल्ल्याची आठवण होते. अमरनाथ आणि सोमनाथ, दोन्ही भगवान शंकराची नांवं. भगवान शंकर हे या देशाचं आराध्य दैवत. आसेतूहिमाचल कुठेही गेलो तरी महादेवाचं मंदीर, अगदी गेला बाजार एखादं शिवलिंग हमखास सापडणार. देशातलं कोणतंही गांव याला अपवाद […]

1 2 3 4 5 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..