लहानपणी शाळेत. पुढे कॉलेज मध्ये. गावातील पारावर. आणि काही ठराविक ठिकाणी गप्पा खूपच रंगतात. आणि नंतर नावच पडून जाते त्याचे. आमच्या गप्पांचे नाव होते आज्जीच्या पायऱ्या. अगदी असेच होते आमच्या गावी घरासमोर एका घराच्या चार पायऱ्या होत्या. तिथे त्या घरातील एक आज्जी सकाळी सकाळी उठून आवरुन तिथे बसायच्या आणि अगदी शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना. भांडी घुणी करणाऱ्या. […]
अखेर शेवटी सुचेता बिल्डिंग दिसली. आणि जीव घायकुतीला आला. गाडी थांबताच दार उघडून धावत आत शिरले. आईसुद्धा बाल्कनी मध्ये वाट बघत उभीच होती. मला गेटमध्ये बघून आत वळली. आता ती तांदूळ ओवाळून टाकणार मग पायावर ते दूध-पाणी घालणार हे माहितीच होतं. त्या हिशोबाने मी शूज काढून तयारीतच होते. […]
मनात राग, मत्सर, द्वेष अथवा डावलून टाकलेले पुढचे पाऊल हे स्वराज्याच्या विरोधात पडलेले पाऊल म्हणूनच गणले गेले. पण जर सर्वांचे हित, प्रेम, विश्वास टिकवून जर पाऊल पडले अन त्याला नामस्मरणाची साथ मिळाली तर स्वराज्य पुर्ती काही अशक्य नाही. […]
डोळे मिटून भूतकाळाच्या विश्वात शिरलं , की अनेक गोष्टी, आठवणी, व्यक्ती, प्रसंग डोळ्यांसमोर लख्ख उभे रहातात. त्यासोबत जोडलेल्या अनेक गोष्टी फेर धरून नाचू लागतात. आनंद, दुःख, समाधान, अशा संमिश्र भावभावनांना स्पर्श करत एक छानसा फेरा पूर्ण होतो आणि पुन्हा एकदा मी वर्तमानकाळात अवतरतो. […]
आता विजयला पटले होते मेहनत तर गाढवही खूप करतो म्हणून त्याला मान मिळत नाही रस्त्यावर आयुष्यभर रक्त आठवून मेहनत करणारे कामगार कधीही श्रीमंत होत नाहीत. श्रीमंती ही नशीबातच असावी लागते. […]
एअरपोर्टवरचे सर्व सोपस्कार एखाद्या सरईतासारखे पार पाडले. माझं फ्लाईट दुपारी २-२.१५ च होतं. हातात आता बऱ्यापैकी वेळ होता. मग मी शॉपिंग करावं ह्या हेतूने वेगवेगळी दुकाने फिरले. तिथल्या किमती ऐकून ‘दुरुन डोंगर साजरे. बसा आहे तिथेच’असं म्हणत मी लांबूनच राम राम केला. […]
त्याचं हे वेगळं असणं , विक्षिप्त वागणं “निरुपद्रवी” प्रकारात मोडण्यासारखं होतं. म्हणजे त्याच्या अशा असण्यामुळे एक वेळ त्याला त्रास होईल पण इतरांचं मात्र कधीच नुकसान झालं नाही. […]
काय करायचे आहे हे पक्के झाल्याशिवाय काय करायचे नाही हे कळत नाही. म्हणून आयुष्यात काय करायचे हे ठरवणे महत्वाचे. काय करायचे ठरले की त्याविषयी जिद्द, महत्वाकांक्षा, विश्वास आपोआप निर्माण होतो. पण जर काय करायचे हेच ठरवले नाही तर सगळेच करायचे यावर समय निघून जातो अन हाती काहीच लागत नाही. […]
लहानपणी हा पडदा जे जे दाखवायचा ते ते सारं खरं वाटायचं. अजूनही भावनाप्रधान पाणी येतच टचकन डोळ्यात कधीतरी खूप तीव्र, आतवर भिडणारं बघितलं की, पण त्यावर आता वाढत्या वयाचं लेबल अलगद लावायला शिकलोय मी! चित्रपटगृहाच्या अंधारात याच्याच आश्वासनावर कित्येक तास विनातक्रार घालविले आणि कळालेही नाही, कधी समृद्ध झालो तो! किती शिकवले या पडद्याने- अजूनही त्याची शाळा सुरूच आहे आणि माझ्या हातातील पाटी-पेन्सिलही. […]
विजय कोणाच्याच चुकीच्या बोलण्याचे अथवा कृतीचे कधीच समर्थन करत नाही. विजयचे बोलणे कित्येकांना उद्धटपणा वाटतो. खरं तर विजयचं सहज बोलणंही एक विचार असतो हे लोकांना उशिरा लक्षात येतं. […]