नवीन लेखन...

उद्योग जगतातील घडामोडी याविषयी लेखन

कोल्हापूरच्या लक्ष्मीताईची “भाकरीची फॅक्टरी”

एकीकडे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करतात. अशीच काहीशी जिद्द उरी बाळगून सोलापुरातील एका महिलेनं भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. तसचं अस्सल महाराष्ट्राचं धान्य असलेल्या ज्वारीला लौकिक प्राप्त करून दिलं आहे. पाहुयात या महिला उद्योजिकेची यशस्वी भरारी. […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ६ – काजू

आपण शाही पुलावावर पेरलेला सुका मेवा बघितला असेल, त्यावर भरपूर काजू पेरलेला पुलाव फार आकर्षक दिसतो. आज आपण या काजूचा विचार करणार आहोत. काजू हा सदाहरित वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी हे फळ […]

जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी

इंटरॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन म्हणजेच आय.बी.एम. ही आयटी क्षेत्रातील जगात दुसर्‍या क्रमांकाची कंपनी म्हणून जगजाहीर आहे. “आयबीएमचा सेल्समन अथवा कर्मचारी क्षणाला काही न काही विकत असतो” हे वॅटसनचे वाक्य मात्र आपल्याला विचार करायला लावते. […]

मंदीतील सुवर्णसंधी

सरकारची धोरणे,वाढते प्रदूषण कमी करण्याचे आव्हान आणि हळूहळू होणारी जनजागृती या मुळे ग्राहक इलेक्टिक वाहनाकडे वळायला नुकतीच सुरवात झाली आहे. हजारो कोटींची गुंतवणूक विद्युतवाहना मध्ये होत आहे. कोव्हिडं चा हा काळ आणि वाहनवर्गाचे संक्रमण लवकरच संपेल आणि पेट्रोल/डिझेल व विद्युत वाहनांना लवकरच चांगले दिवस येतील. ज्या उद्योजकांना वाहन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी, विशेषतः ज्यांना ऑटो डीलर बनायचे आहे त्यांच्यासाठी येते एक वर्ष खूप महत्वाचे आहे. तुम्ही या वर्षात विद्युत दुचाकी वाहनांची डीलरशिप खूप कमी गुंतवणूकीत घेऊ शकता आणि 2025 नंतर येऊ घातलेल्या विद्युत वाहन क्रांतीचा घटक बनून, प्रचंड नफा व स्थैर्य मिळवू शकता. […]

आत्मनिर्भर व्हायचं आहे ? तर मग त्या करता . . .

आधी कोविडची साथ; त्या नंतर सीमे वर चीनची आगळिक; संतापलेल्या भारतीयांनी चीनी वस्तूं वर बहिष्कार टाकण्या करता दिलेली हांक; आणि शेवटी झालेली जाणीव की आपली अर्थ व्यवस्था चीन मधून आयात केलेल्या वस्तूंवर येवढी अवलंबून आहे की आपण फार काही वस्तूं वर बहिष्कार टाकूच शकत नाही. या सर्व घडामोडींच्या निमित्ताने काही मुद्दे अधोरेखित झाले आहेत, व त्याची नोंद आत्ताच घेणे गरजेचे आहे. कारण एकदा का सीमे वर परत शांतता झाली, कोविड संक्रमण आटोक्यात आले, की हे मुद्दे आपल्या करता महत्वाचे राहणार नाहीत. […]

कलम ३७० पश्चात काश्मीरच्या विकासाला चालना

गेली ७० वर्षे या ‘कलम ३७०’ मुळे भारतातील इतर कुठलेही कारखाने, उद्योगपती, उद्योजक काश्मीरमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार, उद्योग-व्यवसाय करू शकत नव्हते. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जो प्रचंड निधी केंद्र सरकारकडून दिला जात असे, त्याचा दुरूपयोग केला जायचा. एखादा प्रकल्प महाराष्ट्रात १० लाखांमध्ये बांधला जात असेल, तर तो जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पटीने जास्त पैसे खर्च करून तयार केला जायचा. ९० टक्के पैसे हे काश्मीरमधील २५० कुटुंबाच्या खिशात जात होता. त्यामध्ये राजकीय पक्ष, तेथील काही उद्योजक आणि हुर्रियत कॉन्फरन्ससारखे समर्थक होते.  […]

व्यवसाय प्रशिक्षण – एक सतत चालणारी प्रक्रिया

शाळा-कॉलेजमधले आपले शिक्षण पूर्ण झाले. शैक्षणिक वर्षाला एक पूर्णविराम असतो.पण एकदा नोकरी लागल्यानंतर ती टिकवून ठेवण्यासाठी, उच्च पदावर जाण्यासाठी पुन्हा अभ्यास करावाच लागतो. व्यवसायात आणि पेशातही तसेच आहे. फरक एवढाच आहे, प्रशासकीय सेवेत असणार्‍या किवा बँक कर्मचार्‍यांना स्वतःच्या पैशांतून प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. व्यावसायिकाला मात्र धंद्यात टिकून राहण्यासाठी अपडेट राहण्यासाठी स्वतः पदरचे पैसे खर्च करावे लागतात. […]

आयटी महासत्ता आणि गुलामगिरी

कोट्यावधींनी संगणक असलेल्या आपल्या देशात अजूनही परदेशी ऑपरेटिंग सिस्टिम, परदेशी वर्ड प्रोसेसर, परदेशी इमेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, परदेशी ब्राऊझर्स वापरावे लागतात हे दुर्दैव आहे. नाहीतरी “गुलामगिरी”ची आपल्याला सवयंच आहे !!! ज्या “मायक्रोसॉफ्ट ऑफिस”वर आम्ही रात्रंदिवस काम करतो तसंच एखादं सॉफ्टवेअर बनवण्याची आमच्याकडच्या “जायंटस”ना इच्छा का होत नाही? […]

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक ही पाण्याच्या बुडबुड्यासारखी आहे. हा बुडबुडा कधीही फूटू शकतो. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक एका फटक्यात शून्य होऊ शकते. अर्थात, या इशार्‍यानंतरही या आभासी चलनाची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. याचे कारण अवैध किंवा बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांसाठी तसेच आभासी चलन गोळा करून काळा पैसा जमा करणार्‍यांसाठी हे एक सुरक्षित माध्यम ठरते आहे. […]

आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे

महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटेल अशी घटना घडली आहे .कप्तान अमोल यादव यांची कथा एखाद्या कादंबरीतल्या कथानका प्रमाणे आहे. […]

1 2 3 4 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..