नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

आजी आजोबांचे आरोग्य – भाग १

आयुर्वेदानुसार वयाचे तीन गट पडतात. बालवय, तारुण्य आणि वार्धक्य. बाल वयात कफ, तरुण वयात पित्त आणि वार्धक्यात वात दोषाचे प्राबल्य असते त्यामुळे उतार वयात वातरोग होण्याची शक्यता जास्त असते. […]

नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग दुसरा

असंच एक देखणं हिलस्टेशन म्हणून महाराष्ट्रातल्या माथेरानला नावाजलं जातं. माथेरानचा अर्थही ‘डोंगरमाथ्यावरील जंगल’ असाच आहे. या हिलस्टेशनचा शोध ‘चौक’ या गावातून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला लागला. नेरळकडून माथेरानकडे जाण्यासाठी अनेक वर्षे घोडे व पायवाटेचा मार्ग होता. नंतर अनेक वर्षांनी नेरळ माथेरान रेल्वे बांधली गेली. या रेल्वेबांधणीचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. सन १९००च्या सुमारास या रेल्वेबांधणीची कल्पना एका […]

भारतमातेच्या वीरांगना – 10 : राणी शिरोमणी

राणी शिरोमणी आपल्या भूमीच्या शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या सोबत लढल्या. म्हणूनच त्यांना मदिनापूरची “राणी लक्ष्मीबाई” असे म्हटले जाते. ह्या लढाईत बरेच इंग्रज सैनिक मारले गेले. आधीच्या छोट्या तुकडीपेक्षा इंग्रजांनी नंतर अधिक सैन्य पाठवले. राणीचे सैन्य अपुरे पडले. ही स्वाभिमानी स्त्री शेवटच्या घटकेपर्यंत लढत राहिली आणि नजर कैद झाली. असे म्हंटले जाते की राणीचा मृत्यू त्या नजरकैदेत असतांनाच झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर राणीला जीवे मारले गेले १८१२ साली. […]

निखळ आनंदाचा झरा ‘बालनाट्य’

‘चुलबुल पांडा’, ‘गाढवाचा दवाखाना’, ‘जम्बो ससा’, ‘वाघोबाची दिवाळी’, ‘रोबो आणि राक्षस’ या बालनाट्यांनी मुलांना एक वेगळाच फिल दिला. उपहास, नक्कल, कोट्या, फार्स, प्रासंगिक, शाद्बिक विनोद, मेलोड्रामा, ब्लॅक कॉमेडी-हे सगळे काही त्यांना इन्स्टंट कळते आणि त्यांची दादही वेगवान असते. मुले नाटकात काम करताना स्वत खूप हसतात. स्लॅपस्टिक कॉमेडी त्यांना खूप आवडते. दुःख हसण्यावरी नेणे म्हणजे काय हे बालनाट्य करताना कळले. […]

नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग पहिला

जगभरात डोंगरमाथे गाठण्यासाठी छोट्या म्हणजे २ फूट रुंदीच्या रुळांवरून टॉय ट्रेन्स धावण्यास साधारण १८९० सालापासून सुरुवात झाली. या गाड्यांचे डबे छोटे आणि सुबक बांधणीचे असतात. डब्यांना दोन्ही बाजूंनी प्रशस्त खिडक्या, छोटी दारं असतात आणि आरामात बसण्यासाठी बाकं असतात. वाफेची वा डिझेल इंजिन असलेल्या अशा गाडीचा वेग इतका कमी असतो, की तरबेज प्रवासी, विक्रेते, अशी मंडळी चालती […]

न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ

न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ काढण्यासाठी मदत झाली ती ‘मेंसेंजर’ या नासानं बुधाकडे पाठवलेल्या अंतराळयानाची. मेसेंजर यानानं २०११ ते २०१५ या काळात बुधाभोवती प्रदक्षिणा घातल्या. बुधाकडे जाताना या यानानं शुक्राजवळूनही प्रवास केला. आपल्याकडील उपकरणाद्वारे, या दोन्ही ग्रहांच्या पृष्ठभागापासून विविध अंतरावरून जाताना या यानानं, या ग्रहांपासून येणाऱ्या न्यूट्रॉन कणांची संख्या मोजली व त्यावरून संशोधकांना न्यूट्रॉनच्या सरासरी आयुष्याचं गणित मांडणं शक्य झालं. या गणितानुसार न्यूट्रॉनचं सरासरी आयुष्य हे फक्त तेरा मिनिटांचं असल्याचं आढळून आलं आहे. […]

भारतमातेच्या वीरांगना – 9 : कनकलता बारुआ

२० सप्टेंबर १९४२ साली तेजपूर पासून ८२ किलोमीटर दूर गहपुर च्या पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याचे निश्चित करण्यात आले. सकाळी आपली घरातल्या कामाची सगळी जबाबदारी पूर्ण करूनच कनकलता घराबाहेर पडल्या. त्या आत्मबलिदानी दलाची सदस्य होत्या ज्यात सगळेच तरुण/तरुणी होते. कनकलता त्यांचे नेतृत्व करत होत्या. ह्या आंदोलनाच्या नेत्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली की कदाचित पुढे येणारे संकट पाहून हे तरुण पळून जातील, आपल्या नेत्यांच्या मनातल्या शंकेला कनकलताने तात्काळ ओळखले आणि जोरदार गरजली, ‘आम्हा तरुणींना अबला समजू नका, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, करेंगे या मरेंगे’, स्वातंत्रता हमारा अधिकार है’ […]

सर्वांग परिपूर्ण सुखाची परिभाषा मेघदूतम् !

रसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे. […]

चित्रकूट एक्सप्रेस: एक प्रयोग

मध्यप्रदेशातील चित्रकूट ही श्रीरामांची कर्मभूमी आणि नानाजी देशमुखांनी राबविलेल्या विविध प्रकल्पांची जागा आहे. ‘विवेक व्यासपीठा’तर्फे ‘चित्रकूट प्रकल्प यात्रे’चं आयोजन करण्यात आलं होतं. कुर्ला टर्मिनस ते चित्रकूट ही यात्रा-स्पेशल गाडी दिमाखात प्लॅटफॉर्मवर उभी होती. १७ डब्यांच्या गाडीच्या प्रत्येक डब्याला नद्यांची नावं देण्यात आली होती. मंदाकिनी, दमणगंगा, कावेरी, गंगा, यमुना, ही नावं झळकत होती व प्रत्येक डब्यावर ऋषितुल्य […]

कविकुलगुरु कालिदास

कालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही. तो ‘होऊन गेलेला’ नाही, तो ‘आहे तसाच’ आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही, तो कालनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ निर्माण करणार्‍या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी ? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही. तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय ? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे. उरले आहे फक्त तादात्म्य.” […]

1 55 56 57 58 59 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..