नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

‘शब्दनाद’ – बारसं..

अपत्याचं नांव ठेवण्याचा विधी. अपत्य जन्मानंतर जनरली १२ व्या दिवशी हा विधी पार पाडला जातो. आपल्यापैकी बर्‍याच जणांना हा विधी ‘बाराव्या’ दिवशी करतात म्हणून त्याला ‘बारसं’ म्हणतात असे वाटते. मलाही असच वाटायचं पण नंतर शब्दांचा अभ्यास करताना अनेक गोष्टी कळत गेल्या त्यापैकी एक ‘बारसं’ हा शब्द आहे. ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते जनांसी सांगावे..’ या […]

स्मृती कारगिल युद्धाच्या

२६ जुलै रोजी कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झाली. अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ […]

गांव, मौजे, खुर्द, बुद्रुक इत्यादी इत्यादी..

‘गांव’ या शब्दाचा जन्म कसा झाला, त्याचा अर्थ काय या प्रश्न मला सतावत होते. शब्दांचा मागोवा घेणे ही माझी खोड आहे आणि त्यानुसार मी या शब्दांचा माग काढत गेलो आणि मोठी विलक्षण माहिती माझ्या हाती आली.. मित्रांनो, ‘गांव’ हा शब्द चक्क ‘गाय’ म्हणजे ‘गो’ या शब्दातून जन्मला आहे. नाही ना विश्वास बसत? आता हा कसा जन्मला? […]

अल्जीब्रा..

शाळेत असताना बहुतेकांच्या जिवाचा थरकाप उडवणारा ‘अल्जीब्रा’ विषय म्हणजे सोप्या मराठीत बीजगणीत..!! ‘अल्जीब्रा’ हा शब्द आपण इंग्रजी आहे असे समजत असलो तरी तो मुळ अरबी शब्द ‘अल ज़ब्र’ या शब्दावरून तयार झाला आहे. या शब्दाचा अरबी अर्थ ‘तुटलेले भाग जोडणे’ असा आहे. गणितात नाही तरी आपणं दुसरं काय करतो..? अरबी गणितज्ञ ‘अबु ज़फ्र मुहम्मद इब्न मुसा […]

मणिपूर – हिंसाचाराने सर्वात ग्रस्त ईशान्येकडील राज्य

अफस्पा काढण्याआधी लष्कर मागे घेणे जरुरी अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यावर निव्रुत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिकुल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत अनेक  बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. संरक्षण व पोलिस दलांनी अतिबळाचा वापर लष्करी विशेषाधिकार […]

बांगलादेशात दहशतवादी हल्ला व त्याचा भारतावर परिणाम

मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे. दहशतवादी हल्ल्यामागे जमायतुल मुजाहिदीन, आयएसआयचा हात बांगलादेशची राजधानी ढाक्यात १ जुलैला शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे इसिसचा नाही, तर बांगलादेशातीलच जमायतुल मुजाहिदीन या अतिरेकी गटाचा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा यशस्वी दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा यशस्वी दौरा भारताची आर्थिक, संरक्षण चौकट मजबुत करण्यासाठी उपयुक्त…. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५-१० जुनच्या पाच देशांच्या दौर्‍यामागे मुख्य उद्देश होता तो अणू पुरवठादार गटामध्ये (न्युक्लिअर सब्स्क्रायबर्स ग्रुप किंवा एनएसजी) भारताला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यातील सदस्य देशांचा पाठिंबा मिळविण्याचा. पाचपैकी तीन देश एनएसजीचे सदस्य आहेत.मोदी यांनी अफगाणिस्तान, कतार,स्वित्झर्लंड,अमेरिका,मेक्सिको या 5 […]

ऑपरेशन थियेटरमधला १ ला दिवस

मेडिकल कॉलेजच्या आगदी सुरवातीचे दिवस आठवतात. १९६० सालचे. त्यावेळी  M.B.B.S.  पांच वर्षाचा कोर्स होता. पहिले दोन वर्षे प्राथमिक विषय ( Anatomy-Physiology ) व नंतरचे ३ वर्षे, क्लिनिकल विषय सर्जरी-मेडिसीन गायनिक इत्यादी. स्टेथॉसकोप प्रथमच गळ्यांत लटके. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला आपण डॉक्टर होत असल्याचची जाणीव त्याक्षणीच होत असे.रोग, निदान, आणि उपाय ह्या मालिकांना आरंभ होत असे. सर्जरी अर्थात […]

भारतातील दहशतवादी हल्ले आणि सौदी अरेबियातून मदत

सौदी अरेबियातून पकडून आणण्यात आलेल्या झबीउद्दिन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्या कारवायांबाबत प्रसारमाध्यमं भरभरून माहिती देत आहेत. वृत्तवाहिन्यांवर चर्चेची गुर्‍हाळं चालू आहेत. हा सगळा तपशील तपासयंत्रणाच पुरवत आहेत, हे उघड आहे. असा हा तपशील प्रसिद्ध झाल्यानं, आपण किती मोठं घबाड पकडून आणलं आहे, असा दावा भारताच्या गुप्तहेर संघटना करतात व  तसं ठसविण्यासाठीही असा तपशील प्रसारमाध्यमांना पुरवला […]

भूतदया

एका थोर विचारवंताचे पुस्तक वाचत होतो.  दया  ह्या गुणधर्मावर त्यांचे भाष्य मनाचा ठाव घेणारे होते. सर्व प्राणीमात्र जीवजंतू झाडे झुडपे वृक्षलता इत्यादी. ज्यांच्यामध्ये जीवंतपणाचे लक्षण असते त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये दयाभाव खोलवर रुजला असतो. ह्य़ाच भावनेमधून प्रेम जिव्हाळा सख्य ह्यांचे अंकूरण होत असते. समाधान तेथेच मिळते. अचानक एक प्रसंग डोळ्यासमोर आला. गावाकडे जात असतांना, आमची गाडी नादुरुस्त […]

1 109 110 111 112 113 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..