आपले सैन्य देशाच्या सीमांचे संरक्षण डोळ्यात तेल घालून करीत आहेत. हे करीत असताना पाकिस्तानच्या घुसखोर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जवान शहीद होत आहेत, तर काहींना दहशतवाद्यांशी लढतालढता वीरमरण येत आहे.आताही मध्यप्रदेशच्या भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून `सिमी’ या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचे आठ दहशतवादी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास निसटल्याची घटना घडली. मात्र, कारागृहातून पळालेल्या या आठ दहशतवाद्यांना आठ तासांतच […]
गाजर हा कंद आपल्या सर्वांच्याच परिचयाचा व फारच आवडीचा.गाजर हे लाल व नारंगी अशा दोन प्रकारची असतात उत्तरेकडचे लालाबुंद गाजर उत्तम प्रतिचे असतात. गाजराचाहलवा,गाजराची,खीर,कोशिंबीर, लोणचे असे एक ना अनेकरूचकर पदार्थ आपण ह्या गाजरापासून बनवित असतो.तसेच ह्यात मुबलक प्रमाणात जीवन सत्व अ असल्याने हे त्वचा व डोळे ह्यांचे आरोग्य उत्तम राखते.तसेच कर्करोगाच्या रूग्णांना देखील कच्च्या गाजराचा रस […]
काँग्रेसी सरकार भ्रष्ट होते म्हणून मोदींचे सरकार निवडून दिले. त्याच्याही प्रत्येक निर्णयावर कथित बुद्धीजीवी तुटून पडताहेत. आपण खरं म्हणजे खुश राहण्याची आपली क्षमता गमावून बसलोय. आपली सहनशक्ती जवळपास संपत आलीय. एखादा निर्णय झाल्याबरोबर त्याचे चांगले – वाईट परिणाम दिसण्याआधीच टीकेची झोड उठवली जाते. याच कारणांमुळे बर्याच नेत्यांनी कुठलाही निर्णय घेण्याची उत्सुकता दाखवली नाही. हा व्यक्ती किमान […]
रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव निर्माण होतो. त्याच वेळी त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो. आगदी बाल वयांतच रामायणातील कथा आपणास सांगितल्या गेल्या. त्यांत भव्यता, दिव्यता, गोडवा, आदर्शता, […]
1972 चा दुष्काळ आठवतोय, माणशी अर्धा लिटर रॉकेल, ते ही डिझेल मिश्रित, त्याचासाठी सुद्धा सकाळ पासून रांगा, घरात जेवढी माणसे तेवढे सगळे वेगवेगळ्या दुकानापुढे उभे रहायचो ! पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे देशात शांतता होती ! रेशन दुकानदाराकडून महिन्याचे सामान घेतले तरच रेशनची दोनशे ग्रॅम साखर, लाल गहू, मिलो, हे मिळणार अशी अवस्था होती. पण […]
तन-मन हलकं होऊन नवनविन अचाट कल्पना सुचायची जगभरात दोनच ठिकाणं. ‘पायखाना’ आणि ‘मयखाना’..! दोन्ही ठिकाणी ‘बसायला’ लागतं.. आणि गम्मत म्हणजे कल्पनांचं जन्मस्थान असणाऱ्या या दोन्ही ठिकाणांचा आपल्या समाजात सभ्य ठिकाणी उच्चार करण असभ्यपणाचं मानलं जातं..! (टीप – पायखानाचा अर्थ स्वत: शोधणे.)
डोंगराच्या कुशीत जन्म घेणारी नदी कुठल्याश्या अनावर ओढिने सागराच्या दिशेने धावत सुटते..दगड-धोंडे, काट्या-कुट्यातून वाट काढत ती सागराकडे झेपावते..डोंगर माहेर तर सागर सासर..सासरी निघालेल्या नदीला माहेराची सय सतत येतं असते आणि एखद्या वळणावर न राहावून नकळत ती माहेराच्या दिशेने वळण घेतै..माहेरी जाण्यासाठी नदी ज्या ठिकाणी वळते ते ठिकाण ‘तिर्थक्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध होतं..माहेराचं हे महत्व..! नदी असो की […]
मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात. […]
तो निश्चल आहे. परोपकारी आहे. हिरवा, पिवळा, तपकिरी, काळसर रंगाचा आहे. उंच आहे. सखल आहे. बाजूला निवडूंग, सीताफळाची जाळी. हेकळा-टाकळा बहरलेल्या. शेळ्या, मेंढय़ा, म्हशी, गुरं-ढोरं अंगाखांद्यावर घेऊन करतो पालनपोषण . अनेक वाटा येऊन मिळतात त्याला.. पांदीच्या, कच्च्या, वळणी, पाऊलवाटा . डोक्यावर चिंचेचं झाड डेरेदार. चिंचेखाली एक बाल आहे. पसरट मोठा दगड़. त्यावर बसून गारमस्त हवा घ्यायची. […]