शेतकरी राजा
शेतकरी आत्महत्या करेन पण चार चौगांच्या हाताला काम देतात म्हणून तो शेतकरी राजा आहे […]
कृषी, शेतीविषयक माहिती, घडामोडी यावरील लेखन
शेतकरी आत्महत्या करेन पण चार चौगांच्या हाताला काम देतात म्हणून तो शेतकरी राजा आहे […]
आपल्याला दररोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर बऱ्याच गोष्टी दिसतात पण आपण त्याचा साकल्याने विचार, चिंतन, अभ्यास किंवा त्याकडे कुतूहलाने बघत नाही. जसे आपल्या शेजारी एखादी इमारत बांधत असतील किंवा जाणाऱ्या येणाऱ्या रत्यावर इमारतीचे बांधकाम चाललेलं असेल तर आपण नुसतं बघतो आणि पुढे जातो. मनात नाना विचार येतात “मुंबईची नुसती वाट लावली आहे”. एवढ्या इमारती बांधून नागरिकांच्या मुलभूत गरजा कश्या भागविता येणार आहेत? मुंबईत दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप घारण करीत आहे. त्याला कारण आहे निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र. त्यात एखादे वर्षी पाऊस नीट पडला नाही आणि तळी भरली नाही की पाणी कपात आणि बरेच काही. हे सगळे सांगण्याचा खटाटोप अश्यासाठी की….. […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र श्री महेश संसारे यांच्या यशाची गाथा आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या कर्तृत्वातुन कृषिक्षेत्राला प्रदान केले. […]
मूळ मेक्सिको देशातील ड्रॅगनफ्रूट या फळपिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशियाई देश आदी ठिकाणी केली जाते. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आदी देशांत या फळपिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते. ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्वासक फळपीक झाले आहे. […]
दरवर्षी शालेय सत्राच्या सुरूवातीस जशी मुलांची, पालकांची शाळासुविधेसाठी धावपळ असते. तशीच रानातदेखील शेतकर्यांची धावपळ सुरू होते. नवा वर्ग, नवे मित्र, नवी शाळा, नवे दप्तर , नवे कपडे. सारे काही नवे नवे. या नवेपणाच्या नवलाईत खूप काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. शेतातही तसेच असते. नवा पाऊस, नवी पालवी, खते पिके आणि नवे बियाणे. हा काळ महत्वाचा याचसाठी […]
२०१९ च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे. […]
जेवण करताना ही प्रार्थना नेहमी करा की, ज्याच्या शेतातून माझं जेवण येते त्यांची मुले कधीच उपाशी झोपु नयेत ! […]
केदार दिवेकर यांच्या फेसबुकवरून साभार […]
हा नक्की संप आहे का?… ही नक्की क्रांती आहे का?… हे नक्की आंदोलनच आहे ना? ४८ हजार लीटर दूध रस्त्यावर ओतणारा शेतकरी आहे का? शेकडो किलो भाजीपाला, धान्याची नासधूस करणारा हा खरोखर शेतकरीच आहे का? हे सर्व मेहनतीनं पिकविणारे, हेच का ते शेतकरी, गाड्या जाळणारे, टायर फोडणारे हे शेतकरीच आहेत का? एवढी करोडो रूपयांची नासधूस करणाऱ्यांना […]
भारतातील शेवग्याचे मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला . म्हणून य वर्षी पुन्हा शेतकर्यांनी गुणवत्ता पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या. एक्स्पोर्ट ची मागणी तेव्हडिच आहे पण उत्पादन चार पट झल्याने बाजार कोसले. भारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे. एका बाजूला कॅलशियम कमतरता वाढून गुढगे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions