नवीन लेखन...

कार्डियक अरेस्ट

काल सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचे ‘कार्डियक अरेस्ट’ च्या कारणाने निधन झाले, हे ऐकून सगळ्यांना शॉक बसला. संपूर्ण देशात पुन्हा चर्चा सुरु झाली की, गेल्या काही काळापासून या कारणाने मृत्यु होणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे.

कार्डियक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक ह्रदयाचे काम करणे बंद होणे होय. विशेष म्हणजे हा आजार दिर्घ काळाचा नसतो, यासाठी ह्रदयाशी संबंधीत असलेल्या आजारांपेक्षा याला खूपच धोकादायक मानले जाते.
लोक याला ह्रदय विकाराचा झटकाच समजतात, मात्र कार्डियक अरेस्ट ह्रदय विकाराच्या झटक्यापेक्षा वेगळा असतो. तज्ज्ञांच्या मते, कार्डियक अरेस्ट तेव्हा होतो, जेव्हा ह्रदय शरीराच्या चारही बाजूंनी रक्तसंचार करणे बंद करते. मेडिकल नियमांनी म्हटले तर ह्रदय विकार सर्कु लेटरी समस्या आहे आणि कार्डियक अटॅक इलेक्ट्रिक कंडक्शनमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे होतो.

आपल्या छातीत दुखायला लागले की, ह्रदय विकाराच्या झटक्यादरम्यानच याप्रकारचे दुखते असे आपण समजतो, मात्र तज्ज्ञांच्या मते, असे दुखणे हार्ट बर्न किंवा कार्डियक अटॅकच्या कारणानेही होऊ शकते.
कार्डियक अरेस्टमध्ये ह्रदयाचे ब्लड सर्कुलेशन पुर्णत: बंद होते. ह्रदयाच्या आत वेंट्रीकुलर फाइब्रिलेशन निर्माण झाल्याने याचा परिणाम ह्रदयाच्या ठोक्यांवर होतो. यामुळे कार्डियक अरेस्टमध्ये काही मिनिटातच मृत्यु होतो.

कार्डियक अरेस्ट अचानकच होतो. विशेष म्हणजे ज्यांना ह्रदयासंबंधी आजारपण आहे, त्यांना कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता जास्त असते.

कधी-कधी कार्डियक अरेस्ट अगोदर छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, पल्पीटेशन, चक्कर येणे, शुद्ध हरपणे, थकवा किंवा ब्लॅकआउट होऊ शकते.

याच्या उपचारासाठी रुग्णास कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिले जाते, ज्यामध्ये ह्रदयाच्या गतीला नियमित केले जाऊ शकते. शिवाय या रुग्णांना ‘डिफाइब्रिलेटर’ने विद्युत शॉक देऊन हार्ट बीटला नियमित करण्याचा प्रयत्न केला जातो.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..