नवीन लेखन...

दख्खनची राणी म्हणजेच डेक्कनक्वीनचा वाढदिवस

१ जून १९३० साली ती सुरुवातीला केवळ शनिवारी धावणारी गाडी होती. ब्रिटिश अधिका-यांसाठी ती सुरू झाली होती. अगदी सुरुवातीला ती कल्याण ते पुणे या मार्गावर धावत होती. मात्र आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस हे स्टेशन बांधून झाल्यानंतर ही गाडी पुढे तिथपर्यंत वाढविण्यात आली आणि आठवडयाची गाडी दररोज करण्यात आली.

सकाळी तीन तास प्रवास करून आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुन्हा संध्याकाळी पुण्यात परत येता येते म्हणून पुणेकरांनी तिचा आश्रय घेतला. तिच्यात पहिल्यांदा विशेष प्रवाशांसाठी पहिल्या वर्गाचा डबा होता, मात्र नंतरच्या काळात डब्याच्या रचनेत, रंगात व सोयींमध्ये अनेक बदल केले गेले आणि दख्खनची राणी वाढत्या वयाबरोबरच नटत गेली. सुरुवातीच्या काळात या गाडीविषयी फारच आकर्षण होते.

कवी वसंत बापट यांनी तिच्यावर एक कविताच केली होती आणि ती लोकप्रियही झाली होती.

दख्खनच्या राणीच्या बसून कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत

अशी ती कविता होती आणि तिच्यामध्ये ती दख्खनची राणी, निसर्गरम्य घाटातून होणारा तिचा प्रवास, त्याचबरोबर बोगद्यातून तिचे जाणे याचे सारे कौतुक करण्यात आलेले होते.

दख्खनच्या राणीच्या प्रवाशांना सुद्धा तिचे फार कौतुक असते आणि दरवर्षी हे प्रवासी हिचा वाढदिवस साजरा करतात. दख्खनच्या राणी ही भारतातली अशी एकमेव जुनी गाडी आहे की, जिला कधीही कोळशाचे इंजिन लावले गेलेले नाही. ती शक्यतो विजेवरच धावते, पण कधी अडचण आलीच तर तिला डिझेल इंजिन जोडले गेलेले आहे.

ती पहिली सुपरफास्ट रेल्वे आहे. मुंबई ते पुणे दरम्यानचे अंतर सव्वा तीन तासात कापले जाते ही कल्पना सुद्धा पूर्वी केली जात नव्हती. आजही डेक्कन क्वीन आपली लोकप्रियता टिकवून आहे. लिम्का बुकमध्ये नोंद असलेली आणि आयएसओ प्रमाणपत्र मिळालेल्या डेक्कन क्वीनची ‘डायिनग कार’ डिसेंबर २०१४ ला काढण्यात आली होती. प्रवाशांची मागणी आणि हर्षां शहा यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १ जून २०१५ रोजी गाडीच्या ८६ व्या वाढदिवशी ‘डायनिंग कार’ पुन्हा जोडण्यात आली.

डेक्कन क्वीन सोबतच पंजाब मेलचाही वाढदिवस आहे. पंजाब मेल १ जून १९१२ वर्षात सुरू झाली होती.

संजीव वेलणकर
९४२२३०१७३३

पुणे.

संदर्भ: इंटरनेट.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..