नवीन लेखन...
Avatar
About (वैद्य) सुविनय दामले
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

आजचा आरोग्य विचार – भाग पाच

टूथपेस्टमधे असलेल्या विषारी पदार्थांबद्दल मागील टीपांमधे सविस्तर लिहून झालेले आहे. त्यामुळे एवढेच लक्षात ठेवूया की, टूथपेस्टची टेक्नाॅलाॅजी भारतीय नाही. अभारतीय आहे. एक काळ असा होता, की पाश्चात्यांना पोट कसे भरावे याची चिंता होती. संस्कृती, संस्कार हे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. लज्जारक्षण कसे करावे, हे त्यांना माहित नव्हते. अर्थात अजून तरी कुठे कळले आहे म्हणा ! लज्जारक्षण […]

आजचा आरोग्य विचार – भाग चार

पाश्चात्य विद्वानांनी लावलेल्या शोधाबद्दल पूर्ण आदर ठेवून ही लेखमाला लिहितोय. कृपया गैरसमज नसावेत. आणि जे शोध लावले जात आहेत, ते विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळेच. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्रातील जे मौलिक संशोधन झाले आहे, त्याबद्दल वाद नाहीच आहे. पण ही प्रगती होण्यासाठी जे पायाचे ओबडधोबड दगड आहेत, त्यांना विसरून कसे चालेल ? विमान आले, रेल्वे आली, बस आली, […]

आजचा आरोग्य विचार – भाग तीन

‘भारतीय संस्कृती’ असा शब्द उच्चारला की, काही जणांच्या नाकाला अगदी मिरच्या झोंबतात. भारतीय पद्धतीने समजावून सांगायचं म्हणजे कालबाह्य गोष्टी ऐकायच्या, जग चाललं चंद्रावर आणि हे बेणं सांगतंय धोतर नेसाया हवं. असे काहीसे नाराजीचे सूर दिसतात. भारतीय संस्कृतीला विज्ञानाचे कधीच वावडे नाही. उलट जगाच्या सर्व संस्कृतींचा नुसता धावता आढावा घेतला तरी भारतीय संस्कृती विज्ञानाधिष्ठीत आहे, असे लक्षात […]

आजचा आरोग्य विचार – भाग दोन

हल्ली लवकर उठणे विसरायलाच झालं आहे. लवकर उठून करायचंय तरी काय, हे विचारणारी नवीन पिढी ! त्या पिढीला शिकवण्यासाठीच दीपावलीसारखा सण आमच्या संस्कृतीने आम्हाला दिला. अभ्यंग स्नान कसे करावे हे आम्हाला शिकवले. वेस्टर्न लोक याबाबतीत अनभिज्ञच आहेत. ते एकवेळ लवकर उठत असतीलही. पण तेल लावून आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान करत असतील ? शक्य नाही. इथेच भारतीय […]

आजचा आरोग्य विचार – भाग एक

आरोग्य मिळवण्यासाठी माझं नेमकं काय चुकतंय ? मी पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली कसा कधी आलो, आणि जे मूलतः भारतीय नाही, पण ज्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे, अशा अनेक गोष्टींना मी माझ्या रोजच्या जीवनात कसं सामावून घेतलंय, हे माझं मलाच विसरायला झालंय. त्याची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच. माझ्या पूर्वीच्या लेखातील काही मुद्दे ओघाओघाने पुनः लिहिले […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग सहा

‍‌‌‌‌‌‌‌कानामागून आली नि तिखट झाली. झटपट गुण देणाऱ्या या पॅथीला समाजामधे लवकर मान्यता मिळाली. घी देखा लेकीन बडगा नही देखा. झटपट गुण दाखवणारी औषधे तेवढ्या झटपट अवगुण दाखवत नाहीत. पण उशीरा का होईना, अवगुण हे दिसणारच. आयुर्वेदाच्या औषधांना पण अवगुण असतातच ! पण तुलनेने खूपच कमी. आणि गुण आहे तिथे अवगुण दिसणारच. असो. मुळात भारतीय असणारी […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग पाच

आरोग्याचा विचार करता, भारताचा विचार करता, चिकित्सेची मुख्य पद्धत आयुर्वेद असायला हवी होती. पण आज भारताच्या या “अल्टीमेट” चिकित्सा पद्धतीला “अल्टरनेटीव्ह” ठरवली गेली. दुय्यम दर्जा दिला गेला. वस्तुतः हिंदुस्थानात जेव्हा कापलेले नाक परत जोडण्याची शस्त्रक्रिया होत होती, तेव्हा अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष साध्या तापाने चुकीच्या औषधोपचाराचा बळी ठरला, हा इतिहास आहे. आणि गंमत म्हणजे नाक जोडण्याची शस्त्रक्रिया (आजच्या […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग चार

कोणताही बदल घडत असताना एकदम घडत नाही. त्याचे काही टप्पे असतात. काळ अनुकुल असावा लागतो. महर्षी योगी अरविंदांच्या समकालीन वासुदेव बळवंत फडके होते. दोघांनाही देशाच्या पारतंत्र्याबद्दल अतीव दुःख होते. पण योगी अरविंदांना झालेल्या गुरु आज्ञेप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला अजून अवकाश असल्याने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारण्याची ही योग्य वेळ नाही, हे जाणून महर्षींनी शस्त्र त्याग केला आणि […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग तीन

बदलायचंय आपल्यालाच. आपल्या पुढील पिढीसाठी! शेवटी नवीन पिढी अनुकरण कोणाचे करणार ? त्यांचे आदर्श कोण असणार ? आपणच ना ! मग आपल्यालाच बदलायला हवे. सगळ्या व्यवस्था, ही मानसिक गुलामगिरी, भारतात हे असलं काही शक्यच नाही, ही नकारात्मक मानसिकता, मीच का म्हणून बदलायचे, हा हट्टवादीपणा ! राज्यकर्त्यांची पराभूत वृत्ती, हे सर्व आधी बदलायला हवं, मी बदललो, तर […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग दोन

एकेकाळी सोने की चिडीयावाला असलेला भारत देश गेला कुठे ? दरडोई १७००० एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले कर्ज फेडायचे कुणी, कसे, आणि कधी ? इंग्रजानी त्यांना राज्य करण्यासाठी आपल्यावर लादलेले आणि आज कालबाह्य झालेले कायदे बदलायचे कुणी ? इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी केलेल्या कायद्याच्या आधारे जो मिळतो तो न्याय योग्य असेलच असेही नाही. मग हे बदलायचे कुणी […]

1 2 3 4 5 6 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..