नवीन लेखन...
नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

“अभिनंदन,आमीर खान तुझे त्रिवार अभिनंदन…!!!”

‘आमीर खानने माफी मागावी’ अशी मागणी करणाऱ्या डॉक्टरांनी, फसवेगिरी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी कधी केली काय ? लोकांचा जनआक्रोश ओढवून घेईपर्यंत डॉक्टरांनी हे प्रकरण ताणू नये, अन्यथा त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. यापूर्वी योगगुरु स्वामी रामदेवबाबांनीही वैधकीय व्यवसायावर वारंवार कोरडे ओढले, आणि सत्य जगासमोर मांडले आहे. […]

पंजाबमधील पोलीस महासंचालक शशिकांत यांचा पराक्रम

पंजाबमधील पोलीस महासंचालक शशिकांत यांनी, कारागृहातील गुन्हेगारांना शारीरिक सुख (वैवाहिक जीवनातील) मिळवून देण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली.अश्या प्रकारची परवानगी मिळाल्यावर, दृष्ट कसाबही त्याच्या बायकोला वा प्रीयेसीला कारागृहात आणण्याची परवानगी मागेल, आम्ही ती देणार काय ? आतंकवादी कारवाया केल्यावरही, भारतीय कारागृहात बायकोसोबत सुख उपभोगता येते, असे समजल्यावर सीमेपलीकडील आतंकवाद्यांना तर, अपार आनंदच होईल.
[…]

गुटखा निर्मिती कंपन्यांमार्फत कायद्याची पायमपल्ली…कागदी वेष्टनाच्या आत प्लास्टिक आवरण

प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे झालेल्या प्रदूषणाने भारतातील तमाम जनता त्रस्त झाली असतांना, काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी सरकारने प्लास्टिकच्या वापरासंबधी काही नियम घालून दिलेत. परंतु या नियमातील त्रुटींचा आधार घेऊन गुटखा निर्मिती कंपन्यांनी पर्यावरणालाच धोका निर्माण केला. […]

गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ…!!!

” गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी |

संग्रहिणी कषायोष्णा लध्वी बल्याग्नि दीपनी ||

दोषज्यामतृडदाहमेहकासाश्च पाण्डूताम |

कामला कुष्ठवातास्रज्वरकृमीवमीर्हरेत ||”

-(भाव प्रकाश )

गुळवेल ह्या वनस्पतीला भारतीय उपचार पद्धती तथा आयुर्वेदात फार महत्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे,जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती सहजतेने जीवंत असते.

रासायनिक घटक- ग्लुकोसीन, जीलोईन, १.२ टक्के स्टार्च, बर्वेरीन, ग्लुकोसाईड, गिलोइमिन, कैसमेंथीन, पामारीन, रीनात्पेरीन, टीनास्पोरिक, उडनशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लीस्टोराल इत्यादी घटक आढळतात.

एवढे महत्वपूर्ण घटक असलेल्या या वनस्पतीमध्ये ‘मायक्रोबैक्टेरीयम ट्युबरकुलौसिस’ (Tuber Culosis), ‘एस्केनीशिया कोलाई’ या आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणाऱ्या रोगाणु ला नष्ट करते, तसेच विषाणू समुह व कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता या दिव्या वनस्पतीमध्ये आहे. […]

शतावरी…..एक दिव्य आयुर्वेदिक वनस्पती !

विविध गुणधर्म असणाऱ्या शतावरीची शेती केल्यास अधिक फायद्याची ठरू शकते, शतावरीच्या वाळलेल्या मुळ्या ३०० ते ४०० रुपये प्रती किलो दराने विकल्या जातात. वार्षिक सरासरी पर्जन्य २५० ते ३०० से.मी.पडतो, तसेच १० ते ५० डिग्री सेल्सियस तापमान आहे त्या ठिकाणीही सहजपणे उत्पादन घेता येते. शेतकऱ्यांना वरदान ठरू शकणाऱ्या ह्या औषधी वनस्पतीच्या शेतीला सुरुवात होणे आवश्यक आहे.

गुणधर्म /उपयोग :- शीत, तिक्त, बुद्धिवर्धक, अग्निवर्धक, शुक्र दुर्बलता दूर करणारी, अशक्तपणा दूर करणारी, अनेक स्त्रीविकारांमध्ये उपयोगी, ऐनिमिया, संधिवात, अर्धांगवायू, लचक, मुरड तसेच हृदयाला बल देणारी व संकाचन क्षमता वाढविणारी, तसेच स्त्रीयांमध्ये गर्भाशय उत्तेजना थांबवून गर्भाशयाची गती संतुलित करणारी. निद्रानाश, रातआंधळेपणा, स्वरभंग, डोकेदुखी तसेच विषघ्न आहे.
[…]

दिव्य औषधी- पांढरी मुसळी

जगातील एकूण उत्पादनाच्या सहा ते सात पट जास्त मागणी असलेली आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणजे पांढरी मुसळी होय. पांढऱ्या मुसळीचे शास्त्रीय नाव – Chlorophytum borivillanum , कुळ- Liliaceae , मराठी नाव- पांढरी मुसळी,सफेदा हिंदी नाव- सफेद मुसली, धोली मुसली संस्कृत नाव- मुसला असे आहेत.

पांढऱ्या मुसळी मध्ये कार्बोहायड्रेडस , प्रोटीन, स्यापोजेनीन, स्यापोनीन, तसेच अनेक खनिज आढळतात.शारीरिक दुर्बलता तसेच ताकतीसाठी, पौष्टिक व बलवर्धक, स्तनदा मातांचे दुध वाढविण्यासाठी, प्रसवोत्तर होणारे स्त्रीरोगांवर उपयोगी, मधुमेह, वंधत्व कमी करण्यासाठी, शुक्रजंतू वाढीसाठी अशा अनेक आजारांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात होतो.
[…]

बिल्व वृक्ष लावा, रोगांना घालवा !

भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरु करण्यात आली.

भावप्रकाश, सुश्रुत साहिंता, भैषज्य रत्नावली आदी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बेलाच्या उपयोगाबाबत खूप लिहून ठेवलेले आहे. उष्णताहरक, वात कफ शामक, रेचक, दीपनकारी, हृदयास उपकारक, स्तन्भक, शरीरातील मुत्र व शर्करा कमी करणारा आदी महत्वपूर्ण गुणधर्म असलेला बेल आयुर्वेदाचा महत्वपूर्ण झाड आहे.
[…]

आवळा एक जीवनीय शक्ती …!

आज रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या आत्यंतिक वापरामुळे, आपल्या खाण्यात येणारी फळे नैसर्गिक पद्धतीने पिकविली असतील याची शाश्वती देता येत नाही. जर ती आपल्या परसबागेत पिकवून वापरता आली तर त्या फळाच्या शतप्रतिशत शुद्धतेबाबत आपल्याला विश्वास असतो.

पाश्चात्य उपचारपद्धतीला अवास्तव महत्व दिल्याने भारतीय जीवनशैलीचे विस्मरण होत गेले. आहार विहाराबाबत ऋतुमानानुसार घ्यावयाची काळजी नगण्य वाटायला लागली. सुश्रुत सहिंतेतील सुत्रांप्रमाणे कितीतरी सूत्रे आवळ्याच्या उपयोगाबाबत संस्कृत साहित्यात लिहून ठेवलेले आहेत.
[…]

उशिरा सुचलेले शहाणपण……म्हणे पाकिस्तान अत्यंत धोकादायक राष्ट्र

शांतता, सुरक्षितता, सौहार्द, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी बाबींपासून कोसो दूर असलेला देश धोकदायक असणार नाही तर काय ? पाकिस्तानात जोपर्यंत इजिप्त, ट्युनिशिया, लिबिया प्रमाणे विद्रोह होत नाही व या हुकुमशहांना कायमचे संपविले जात नाही तोपर्यंत पाकी जनतेला सुख मिळणार नाही व तेथील धोकादायक परिस्थिती संपणार नाही.

फक्त पाकिस्तानच धोकादायक नसून तेथे वारंवार येणारे सैनिकी हुकुमशहा हे सुद्धा संपूर्ण जगाला धोकादायक आहेत…..!
[…]

आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि युवकांची भूमिका

“धर्मांधतेने आणि धार्मिक कट्टरवादाच्या विषवृक्षाला आलेली गोंडस पण सर्वनाशाकडे नेणारी फळे म्हणजे दहशतवाद होय.” आतापर्यंत भारताचे अनेक तुकडे पाडण्यात परकीय सत्ता यशस्वी झाल्यात. पाकीस्थान, बांगलादेश, नेपाळ तसेच अफगाणिस्थान हा भाग भारतातूनच तोडल्या गेला हे इतिहासावरून सहज समजेल . अफगाणिस्थानातील ‘हिंदुकृश’ पर्वतरांगांच्या नावावरून सहज लक्षात येईल.आजपर्यंत भारताने वारंवार दहशतवादाचे विकारल स्वरूप जगापुढे मांडले, परंतु प्रत्यक्ष झळ पोहचेपर्यंत अमेरिकाही जागी झाली नाही. […]

1 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..