नवीन लेखन...
जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

लक्षवेधी सूचना…

कुठल्याही कार्यालयात मग ते सरकारी असो की खाजगी असो कामाच्या वेळात काम हे केलेच पाहिजे म्हणजे ज्याचा आपण काम करून मोबदला घेतो तो चोख आणि प्रामाणिकपणे करणे आपले कर्तव्य आहे. पण काही वेळा स्मार्टफोनमुळे कामात टंगळमंगळ केली जाते मोबाईल वरील मेसेज वाचण्यात आणि ते पुढे पाठविण्यात आणि च्याटींग करण्यात बराचसा वेळ फुकट जातो पण हे कर्मचार्यांच्या लक्षात येत नाही आणि जबाबदार वरिष्ठ अधिकार्यांना नाईलाजाने लक्षवेधी सुचनेसारखे नियम आस्थापनांत लागू करावे लागतात हा नियम कर्मचार्यांसकट जनतेसाठीही लागू होतो आणि मग दोघांचीही मने शासन, अस्थापन आणि अधिकार्यांप्रती दुषित होतात. […]

श्रावण सरी….!!

|| हरी ॐ || आल्या आल्या श्रावण सरी, अवचित करिती चिंब परी ! उन पावसाच्या खेळ हा, सप्तरंगी पडदया आड हा ! रत्यांवर हिरव्या पानांचा सडा, दिसतो जसा हिरवा सरडा ! सख्या निघाल्या खेळाया ह्या, जमवून बाहुलीचे लग्न त्या ! रानीवनी मुक्त हिंडती ! लग्नासाठी जागा निवडती ! जंगलातील रस्ता निसरडा ! तरी नसे मना मुरडा […]

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी

आज प्रमुख शहरांमधील रोज वाढणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लक्षात घेता ती तोकडी पडते की काय असे चित्र बघावयास मिळते किंवा शहरातील नागरिकांस सर्व दृष्टीने सोयीची नाही असे स्पष्ट होते. तरी बरं मुंबईतील बहुसंख्य नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करून घेतात, नाही तर…! आजच्या घडीला शहरात वाहनांची एवढी कोंडी होते की एखाद्या ठराविक स्थानापर्यंत पोहचण्यास विलंब होतो. […]

व्रत-वैकल्याचा आला श्रावण…

  सरत्या आषाढात बरसला मुसळधार शेती झाली हिरवीगार   नद्या, तळी, धरणे भरली काठोकाठ पाण्याची चिंता टळली पाठोपाठ   आषाढा नंतर आला श्रावण नभ मेघांनी आले दाटून   रिमझिम बरसती धारा सुंदर ऊन पावसाचा खेळ अधीर   श्रावण सरींनी केले नृत्य मस्त मयुरी येई ठुमकत   इंद्रधनुचे बांधून तोरण करी रंगांची उधळण   श्रावण सोमवारी भोलानाथ […]

आला पाऊस…..

  पावसाची वाट बघता बघता सरी लागल्या कोसळू राने झाली हिरवीगार नद्या लागल्या ओसंडू !   वाऱ्याची थंड झुळूक करी मना आनंद सगळा आळस क्षणात जाई कुठे पळून !   मोरांचे थुईथुई नाचणे सांगत होते आले मेघ दाटून बरसला मनसोक्त हातचे काही न राखून !   घरांच्या छपरावरून वाहणारे पाणी पडत होते पाघोळ्यांनी अंगणात प्रत्येक थेंबाचे […]

कबुतरखान्यांच्या निमित्ताने…

मुंबई आणि आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या कबुतरांची गणना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करणार आहे. पहिल्या टप्प्यात कबुतरांची संख्या मोजली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कबुतरखाने, कबुतरांचे राहणीमान, त्याचे लोकांवरील परिणाम आणि तिसऱ्या टप्प्यात विविध डॉक्टरांशी चर्चा करून, कबुतरांचे आरोग्य आणि कबुतरांचे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयी माहिती मिळविली जाईल. मुंबईत कबुतरांसाठी दाण्यांची, राहण्याची आणि सुरक्षेची सोय सहज होते. अशा अनेक कारणांमुळे मुंबईत कबुतरांची संख्या येत्या काळात अधिक वाढणार आहे, असे बीएनएचएसचे म्हणणे आहे. […]

आले पावसोजींच्या मना !

  आले लहरी पावसोजींच्या मना सुट्टीत जावे मामाच्या गावा,   फोनवरून झालं बोलणं दिवस ठरला एकदाचा, गाड्या सगळ्या फुल झाल्या पेच पडला तिकिटाचा !   पाऊसोजी म्हणाले आईला काळजी नसावी, आपले आहेना ‘मेघ’ विमान, आई म्हणाली पावसोजीला प्रवास खूप दूरचा, सांभाळून चालव वाहान !   ठेव जवळ जलाचा साठा वाटेत लागली तहान जर जलाचा आहे तुटवडा […]

एल निनो आणि त्याचे परिणाम !

दरवर्षी जून महिन्याच्या सुरवातीला देशात पावसाच्या आगमनाला सुरुवात होत असते. वेधशाळेच्या अंदाजानुसार त्याआधी सगळ्या प्रिंट मिडिया आणि वृत्तवाहिन्यांतून पावसाच्या आगमनाचे अंदाज वर्तवण्यात येत असतात. पण असे लक्षात येऊ लागले की अंदाज कुठेतरी चुकत आहेत! या सगळ्याला कुठलेतरी वातावरणातील बदल जबाबदार आहेत किंवा दैनंदिन जीवनात आपल्या हातून घडण्याऱ्या चुकीच्या कृतींचे पडसाद असतील. उदा. झाडे तोडणे त्या जागी नवीन झाडे न लागणे, त्यांचे संवर्धन न करणे, कारखान्यांतून आणि इतर गोष्टींतून वातावरणात प्रदुषित आणि विषारी वायूचे उत्सर्जन प्रमाणाच्या बाहेर होणे इत्यादी. काही प्रमाणत एल निनोचाही यात सहभाग असतो. […]

गेले ते दिन गेले !

असले जरी शिक्षण बेताचे वागलो नाही कधी विचित्र, चाळीतील मध्यमवर्गी आम्हीं राहत होतो एकत्र !   चाळीने आम्हांला शिकविले भेदभाव विसरायला, प्रसंग कोणावर बिकट आला शिकविले प्रथम मदत करायला !   चाळीत कॉमन नळाला पहाटे पाचला पाणी, सातवाजता पाणी गेल्यावर मिळणार नाही थेंब पाणी !   ब्रशने दात घासता घासता भरभर प्रातर्विधी उरकायचे, दुधासाठी सेंटरवर धावायचे […]

बेस्ट बिफोर…..!

२४ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी “ग्राहक संरक्षण कायदा – १९८६” वर स्वाक्षरी केली. या निमित्ताने आपण दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. पण एक जागरूक ग्राहक म्हणून आपण त्याचा किती उपयोग करतो? […]

1 2 3 4 5 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..