नवीन लेखन...
जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

भारताचे अंतराळक्षेत्रातील स्थान

एकंदरीत भविष्य काळात अंतराळ ही देखील प्रमुख युद्धभूमी असेल हे लक्षात घेऊन भारताने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक बैठकीत देशाच्या स्वसंरक्षणासाठी ‘डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी’च्या (डीएसआरए) स्थापनेचा खूप चांगला निर्णय घेतला. ही यंत्रणा अंतराळ युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रात्रे व त्यासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित करील. या संशोधनाच्या माध्यमातून ‘डिफेन्स स्पेस एजन्सी’ला सहाय्य करण्याचे काम (डीएसआरए) द्वारे केले जाईल. आणि भारताने घेतलेला निर्णय खरोखरच स्तुत्य आणि संरक्षण दृष्ट्या आवश्यक आहे. […]

वारी आषाढीची !

|| हरी ओम || वारी आषाढीची ! नाम वारीचे घेता पंढरपूर आठवे भक्ता ! चंद्रभागेच्या तिरी विठ्ठल विठ्ठल नाम गजरी !   जप तप नाम हाची लळा हाची पांडुरंगाचा सोहळा ! जया मनी गोड भाव तया सावळ्याचा तो ठाव !   भक्तीरसात डुंबावे कैसे इतरा सांगावे ! स्वहानुभावे वेचावे पांडुरंगी तल्लीन व्हावे !   ऐसा वारीचा […]

तृप्ती आणि समाधान

तृप्ती व समाधानात धुसर रेषा समाधानात तृप्ती का तृप्तीत समाधान ! तृप्ती व समाधान जीवनाच्या गाडीची दोन चाके एक चालते दुसरे डुगडुगते ! समाधानाच्या वाटेवर अतृप्तीचे काटे तृप्तीच्या युक्तीने एकही न रुते ! तोच खरा मार्ग समाधानाने तृप होतो तृप्तता मिळूनही समाधान होत नाही त्याचा मार्ग चुकतो ! समाधानाच्या पाठी धावताना तृप्ती दिसेनाशी होते समाधानातून तृप्ती […]

खिडक्या दोन जीर्ण !

इमारतीचा झाला आहे आता खंडहर, अनेक खिडक्यात आहेत दोन जीर्ण, एकमेका पाहत, म्हणत एक दुसरीला, आहे का कोणी आपली काळजी घ्यायला? काळ चालला आहे वेगात, न थांबता, न संपता, बिचाऱ्या पाहत होत्या वाट आपल्या ‘कांती’ बदलाची ! ओसरला त्यांचा आनंद क्षणात, आले होते कोणी इमारत पाडण्या, काही होत्या सुपात काही जात्यात, बघोनिया दूर, भयंकर प्रश्नचिन्हांत ! […]

प्लॅस्टिकचा शोध आणि बोध !

प्लास्टीकचा आपण आपल्या दैनदिन जीवनात चांगला उपयोग करून घेत आहोत. पण आपला आळस, बेशिस्तपणा, कुठेही, कधीही, केंव्हाही रत्यात, ट्रेनमध्ये गुटका, पान खाऊन थुंकण्याची, समुद्र व नदीत प्लास्टिक कचरा टाकण्याची वाईट सवयी निसर्ग साखळीचा आणि पर्यावरणाचा बिकट प्रश्न निर्माण करीत आहे, त्याला काळिमा लावत आहे. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी

डॉ.अनिरुद्ध जोशी ते परमपूज्य बापू हा प्रवास एक विलक्षण दैवयोग आहे आणि असा सगळ्याच व्यक्तींच्या नशिबी येत नसतो त्यासाठी काहीतरी पूर्व पुण्याई किंवा नियंत्याची योजना असतेचं. त्यांचे लाघवी व्यक्तिमत्व, मर्यादा राखणारा स्वभाव, करारी बाणा, जनमानसावर आईसारखे निर्व्याज प्रेम करण्याची सवय, दुसऱ्याला मदतीला प्रथम धावून जाण्याचे संस्कार, जाती, धर्म, पंथ, लिंग यात त्यांनी कधीच भेदाभेद केला नाही हे सर्व लेखांतून वेळोवेळी प्रगट होतांना दिसते आणि आता परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू झाल्यावरही अजून ते सर्वांना आपले श्रद्धावानमित्र व आप्त मानतात. […]

मन झाले फुलपाखरू

मन झाले फुलपाखरू मन झाले फुलपाखरू जीवन जगताना गती स्वैर किती मनाचा ठाव कोणा किती? असते आपल्याच खुशीत मनाचा लपंडाव कोणा कळला? मन भरून राहिला कोपरा देत राहिला ठोकरा मन मनाच्या साखळ्या गुंतता गुंती गुंता सोडविण्या त्या सगळ्या हैराण जीव पुरता मन मनाचा मोठा गुंता गुंता तुटता ना सूटता मन मनाचे द्वैत भांडते आतल्या आत होण्या […]

पाण्याचा असाही उपयोग

आपल्याला दररोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर बऱ्याच गोष्टी दिसतात पण आपण त्याचा साकल्याने विचार, चिंतन, अभ्यास किंवा त्याकडे कुतूहलाने बघत नाही. जसे आपल्या शेजारी एखादी इमारत बांधत असतील किंवा जाणाऱ्या येणाऱ्या रत्यावर इमारतीचे बांधकाम चाललेलं असेल तर आपण नुसतं बघतो आणि पुढे जातो. मनात नाना विचार येतात “मुंबईची नुसती वाट लावली आहे”. एवढ्या इमारती बांधून नागरिकांच्या मुलभूत गरजा कश्या भागविता येणार आहेत? मुंबईत दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप घारण करीत आहे. त्याला कारण आहे निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र. त्यात एखादे वर्षी पाऊस नीट पडला नाही आणि तळी भरली नाही की पाणी कपात आणि बरेच काही. हे सगळे सांगण्याचा खटाटोप अश्यासाठी की….. […]

धुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

मुंबईत पावसाळ्यानंतर हवामानात अचानक कोरडेपणा आपल्यामुळे सगळीकडे धूळ मिश्रीत हवामान आहे. सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, धूळ आणि धुराळामिश्रीत बदलती हवा मुंबईकरांच्या समस्या रोज वाढवतच आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा चेंबूर, देवनार, सायन या भागात राहणाऱ्या अनेकांनी आरोग्याच्या तक्रारींमुळे राहती घर भाड्याने देऊन उपनगरांमध्ये शिफ्ट झाले आहेत. कचऱ्याच्या डम्पिंगमुळे होणारे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. […]

समुद्र

समुद्राला अनुभवण्यासाठी त्याच्या कुशीत शिरावे लागते समुद्राची खोली मोजण्यासाठी त्याच्या तळाशी जावे लागते समुद्राची लांबी रुंदी कळण्यासाठी जगाची सफर करावी लागते समुद्रांचे रंग समजण्यासाठी त्याच्या जुनियेत जगावे लागते समुद्राची गोडी अनुभवण्यासाठी त्यावर प्रेम करावे लागते समुद्रांच्या लाटांवर स्वार होण्यासाठी अभ्यास, अनुभव आणि धाडस असावे लागते चक्रीवादळात अडकणार्यांना समुद्र मंथनाचा अनुभवातून अमृत विष आणि तत्नांची ओळख पटते […]

1 2 3 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..