नवीन लेखन...
Avatar
About जनार्दन गव्हाळे
दैनिक दिव्य मराठी औरंगाबाद येथे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी देशोन्नती अकोला, लोकमत अकोला, दैनिक दिव्य मराठी अकोला येथे काम केलेले आहे. तसेच समतेचे आद्य प्रवर्तक गुरू रविदास हे पुस्तक पद्मश्री प्रकाशन सावदा जि. जळगाव ने प्रकाशित केलेले आहे. स्वतंत्र असा विषय लिहिण्यासाठी नसून चालू घडामोडीवर भाष्य करणे आवडते.

आंबेटाकळीची आमराई

माझे मूळ गाव खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले असून गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे, नावाप्रमाणे आंबेटाकळी शिवारात आमराई होत्या. त्या लोप पावल्या असल्या तरी आठवणी मात्र कायम आहेत. याविषयी… […]

बाजरं पाहिलं पेरून…

कसं हाय भाऊ कोणालेही वाटते की, शेती करणे फार सोपे आहे. पण प्रत्यक्षात शेती करणे किती कठीण आहे, हे ज्याचे त्यालाच समजते. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ अशी परिस्थिती आहे. टोले एवढे पडतात की, सांगता सोय नाही. दिवस निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत काहीना काही टोले घेणे सुरूच असते. त्याले घडीची फुरसत नसते. तरीही बाकीच्यांना शेती मात्र सोपी वाटते. […]

अशी पाखरे येति..आणिक स्मृति ठेवूनि जाती

मनुष्याला आपल्या आयुष्यात प्रत्येकक्षणी सतत काहीतरी हवे असते. आणि या हव्यासापोटी तो आपले सामाजिक कर्तव्य विसरत चालला आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी करत असताना सामाजिक बांधीलकीचे भान ठेवणे गरजेचे आहे, आणि काही व्यक्ती ठेवतातही. त्यापैकीच खामगावचे एक कलाशिक्षक संजय गुरव. प्राणीमात्रांची सेवा करून इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा छंद त्यांनी जोपासला आहे. आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात बहुतांश पालक आपल्या मुलांना […]

अपघाताच्या गंभीर प्रसंगातही उदासीनता

मागच्या शनिवारी साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाण्याचे ठरवले. सकाळी 10.30 वाजेच्या पॅसेंजर रेल्वेने अकोल्याहून शेगावला पोहोचलो. मंदिरात गेल्यानंतर अगदी पाच मिनिटांतच ‘श्रीं’चे दर्शन झाले. लवकर दर्शन झाल्याचा आनंद होताच. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या भेटीगाठी घेत परतीसाठी पुन्हा शेगाव रेल्वेस्टेशन गाठले. सायंकाळी 4.30 वाजेच्या पॅसेंजर गाडीसाठी अकोला, अमरावतीकडे जाणा-या प्रवाशांची गर्दी होतीच. हिवाळ्याचे […]

मोठ्यांचा खेळ होतो, आमचा जीव जातो

वाशीम जिल्ह्यातील सवड या गावात मोठी दुर्घटना घडली. १९ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे वॉकिंगला जाणाऱ्या तीन मुलांना एका अज्ञात कारने चिरडले. काहीही चूक नसताना बिचाऱ्या तिघांना आपला जीव गमवावा लागला. रिसोड जवळील सवड येथील अंकित गौतम जाधव वय १४ वर्षे, वैभव विश्वनाथ वाकळे वय १५ वर्षे, करण लक्ष्मण खांदळे वय १३ वर्षे हे तिघे मित्र आज […]

हरवलेल्या बॅगचा शोध

आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार […]

वेगळा विदर्भ का?

वेगळा विदर्भ का? हा कायमच चर्चेचा विषय आहे. काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही. पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल. पण कृपया वाचा एकदा तरी.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले. आता छत्तीसगड चा विकास दर (growth rate) […]

समतेचे आद्य प्रवर्तक संत रविदास महाराज

संत रविदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रविदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्‍या आहेत. रविदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. […]

कशाला हवयं विदर्भ राज्य ?

महाराष्ट्रात विदर्भ आणि विदर्भात वऱ्हाड. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणत सोन्याची कुऱ्हाड. असा आमचा प्रदेश. महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला बुलडाणा जिल्हा. त्यात खामगाव तालुका. आमच्या जिल्ह्याचे वैशिष्टये म्हणजे, भौगोलिक दृष्ट्या एकसंघ नाही. काही भाग घाटावर तर अर्धा भाग घाटाखाली. त्यामुळे सरळ सरळ जिल्ह्याचे दोन भाग पडलेले आहेत. दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे, बुलडाणा जिल्हा विदर्भात असला तरी अगदी पश्चिम विदर्भात […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..