नवीन लेखन...
Avatar
About अनिलराव जगन्नाथ
उत्कृष्ट वक्ता, लेखक, ब्लॉगर, राजकीय सामाजिक आर्थिक घडामोडींचा अभ्यासक https://anilraojagannath.blogspot.com/?m=1

इथं काय महत्त्व राखतं..!

ही धरा कुणाच्याही ‘बापाची जहागीर’ नाही… म्हणून इथं अमानवीयतेचा अंत महत्त्व राखतो… तर माणुसकीचा ‘नव्याने जन्म’ सुद्धा अधिक महत्त्व राखतो… […]

शून्याला शरण !

त्यांना ती शांतता समजली असावी कदाचित, योग्यतेशिवाय शून्य होण्यापेक्षा, शून्याला शरण केंव्हाही उत्तमचं..! हा व्यक्त होण्याचा सर्वात पवित्र मार्ग असतो व्यर्थ शब्दांशिवाय…! नजरेआडून फिरणाऱ्या त्या सर्व गोष्टी एकसारख्या नसतातचं, बरबटलेल्या ऐहिक सुखापेक्षा शुद्ध मन पर्वतासमान असतं..! आणि ती दैहिक भावना, ते राखेसारख्या निपजलेल्या अंगाराला सोबती करावी लागते. कधी कधी त्याच्याही स्पर्श केवढा थंड भासतो…! कर्त्याला नाकर्तेपणाचं […]

नक्कीचं उजाडेल..!

आपण अनेक शंकासुराच्या काटेरी कुंपणातुन गेलो आहोतचं, पण थोडे आपले बोल असत्याच्या चौकातून सत्याच्या मार्गाकडे रममाण झाले तर थोडं लवकर नक्कीच उजाडेल…! […]

प्रेमवेडा

एखाद्यावर भरभरून प्रेम करणाऱ्याला प्रेमाच्या बदल्यात कधी कधी प्रेमच मिळतं नाही. मग त्याची मानसिकता प्रेम करणाऱ्यांच्या आणि प्रेमाच्याही अगदी विरोधी बनते. आणि त्याचा प्रेमावरून विश्वास उडतो. मग तो एकेवेळी प्रेमात वेडा झालेला प्रेमीक प्रेमाचा विरोध करतो आहे असं आपल्याला भासतं. […]

माझं ऐकं द्रौपदी !

म्हणून माझं ऐकं द्रौपदी, तू शस्त्र उचल, आणि जोपर्यंत या कलियुगी मानसिकतेचा संहार होणार नाही, थांबू नकोस..
आता कोणी कृष्ण येणार नाही .. !!! […]

हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरण

देशात आज पर्यंत लाखो गुन्हे झाले, मग त्या तुलनेत पोलिसांनी किती जणांचे एन्काऊंटर केले..? टक्केवारीत आकडा उलगडला तर ते प्रमाण 0.01 च्या आसपास येईल. गुन्हा करूनसुद्धा न्यायालयातून निर्दोष सुटणाऱ्यांचं प्रमाण काढलं तर तो आकडा ‘आभाळा’ एवढा भासेल. Extra judicial killing ला माझा पाठिंबा आहे असं बिलकुल नाही, मी फक्त मिडियापुढं बडबडणाऱ्या बुद्धिवंतांच्या सत्येतला विरोधाभास दाखवतोय. […]

ती अभागी…!

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात शाळेतील क ख ग तर तिच्या ओठीही नाही…! पुढाऱ्यांच्या बॅनर वरच्या मोठमोठ्या निर्जीव माणसांकडे पाहात पाहात, नशिबाचं गाणं गात गात ती गर्दीत कुठे आणि कधी हरवून जाते माहीत नाही…! […]

राजकारणाचं वास्तव !

वेगवेगळ्या प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पुढाऱ्यांची स्वतःची एक आवड असते. आणि त्यातूनच हे असले रिकामटेकडे वाद निर्माण होतात. ते अतिशयोक्तीने तुडुंब भरलेली भाषणे करतात. कधीकधी अशी व्याख्याने मानसिक बेशुद्धपणाचं जिवंत उदाहरण असतात. परंतु त्यांचे शब्द सामान्य लक्ष्यित भावनांना स्पर्श करतात. […]

स्त्री आणि महाभारत

जेंव्हा जेंव्हा स्त्री तिच्या सन्मानापुढे झुकली नाही, तेंव्हा एक ‘दुर्योधन’ जन्म घेतोच. हा नियतीचा डाव आहे. मग काय स्त्री भर सभेत बदनाम केली जाते. अब्रुची लखतरे तोडणारी गिधाडे पिंगा घालू लागतात. […]

बाल दिनाच्या शुभेच्छा..!

जीवन आता ‘चक्रीवादळ’ बनले आहे, ते निरागस बालपण कोणत्या हवेच्या झुळकेसोबत तरंगत गेलं कळलं पण नाही. ज्या जवाणीच्या हट्टापायी बालपण गमावलं, तीनं तर चक्रव्यूहातचं सोडलं..! […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..