नवीन लेखन...

तेजोवलय (Aura) भाग ३

वैशाली देशपांडे यांच्या WhatsApp वरुन आलेल्या लेखाचा हा तिसरा भाग…


नमस्कार मंडळी,

आपण मागच्या २ भागां मधे बघितलं की तेजोवलय म्हणजे काय, ते कशा प्रकारे आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकतं.. कुठली अशी कारणं आहेत ज्यांनी ते संक्रमित किंवा दूषित होतं.. दुषित झालेलं ओळखावं कसं, आणि ते शुद्ध (clean) ठेवण्याचे फायदे काय आहेत.

तेजोवलय अंतर्गत आणि बाह्य अशा विविध गोष्टीनी प्रभावित होत असतं आणि त्यामुळे सतत बदलत असतं. दिवसभरात बऱ्याच घटना, गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते. आणि आपले तेजोवलय संक्रमित होत राहाते.

आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो.

1. मीठाचा वापर
हा फार छान त्वरित results देणारा उपाय आहे. बाजारात खडा मीठ (sea salt) मिळतं. अतिशय स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध आहे. नाहीच मिळालं तर साधं मिठ सुधा चालेल.

मिठामधे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे. घरात खूप कलह, वादविवाद चाललेत, आजारपणं संपत नाहीयेत, नकारात्मकता जाणवतेय, अडचणी येतायत, किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणून रोज सुद्धा.. हे मीठ काचेच्या छोट्या छोट्या बाऊल्स मधे भरून घरात/ ऑफिसमधे प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी, पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल, किंवा खराब होईल. आशा वेळेस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेट मधे टाकून द्या. कमीतकमी 3 महिने हा उपाय सतत करत राहावा. मिठाच्या पाण्याने रोज लादी ही पुसू शकता.

जेव्हा कधी खूप depress किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती, किंवा कसलं वाईट वाटत असेल त्या वेळेस दोन्ही मुठीं मधे खडा मीठ घ्या, आणि दोन्ही पाय साधारण गुडघ्यांपर्यंत (खडा मीठ घातलेल्या) गरम पाण्यात बुडवून डोळे बंद करून 10 मिनिट बसा. मनातल्या मनात “माझं तेजोवलय पूर्णपणे शुद्ध झालं आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा ह्या मिठात आणि पाण्यात उतरून निघून गेली आहे” असं म्हणत राहा.. आणि फरक बघा. वर सांगितल्या प्रमाणे, हे पाणी आणि मीठ त्वरित टॉयलेट मधे फेकून द्यावे.

खूपच negative वाटत असेल, किंवा कधी अशा negative वातावरणात जायची, किंवा अशा लोकांशी interact करायची वेळ आली, तर घरी आल्यावर स्नानाच्या अर्धी बादली पाण्यात मूठभर मीठ टाकून त्याने स्नान करावे. मनात वर सांगितलेले intention म्हणावे आणि नंतर नेहेमीसारखे साबण लावून स्नान करावे. हा पण खूप परिणामकारक उपाय आहे.. फक्त ज्यांची त्वचा sensitive आहे त्यांनी रोज करू नये.
अशा लोकांनी मिठा ऐवजी पाण्यात apple cider vinegar चा वापर करावा.

2. ध्यान (meditation)
ध्यानाचे फायदे अपरिमित आहेत. याने तुमचे तेजोवलय तर नेहेमी शुद्ध (clean) आणि strong राहतेच, पण तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ज्यांनी ध्यान आधी केलं नाहीये, किंवा ध्यानाबद्दल माहिती नाही, त्यांच्या साठी अतिशय powerful “1 minute meditation” काल ग्रुपवर पोस्ट केलं होतं.

3. सकारात्मक विचार
ईश्वराने माणसाला विचार करण्याची फार मोठी शक्ती दिली आहे ज्याने तो आपल्या जीवनाचं शिल्पं हवं तसं घडवू शकतो. पण बहुतेक वेळा आपण ही शक्ती नकारात्मकते मधे वाया घालवतो. घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं, किंवा बाह्यपरिस्थिती कशीही असली तरी आपण बाह्य जग बदलू शकत नाही. आपण फक्त स्वताला बदलू शकतो. सकारात्मक विचारांनी तुमचं तेजोवलाय नुसतं शुद्धच होत नाही तर ते अधिकाधिक strong होत रहातं आणि त्याला natural protection मिळत राहात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की समोरची माणसं त्यांच्या विचारातून, बोलण्यातून कितीही नकारात्मकता तुमच्यावर फेकत असली, तरी तुमच्या सकारात्मक विचारां मूळे, तुम्ही त्याने प्रभावित होत नाही. सततच्या सकारात्मक (positive) विचारां मुळे बाह्य परिस्थिती सुद्धा हळूहळू बदलत जाते.

4. संगत
आपण नेहेमी नकारात्मक लोकांच्या संगतीत राहतो का.. कोणाशी बोलुन ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासी, दुःखी, एकटं, किंवा depress वाटतं का.. तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतलेली आहे. जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असेल किंवा अशा व्यक्तींशी टाळता येत नाही असा रोजचा संबंध येत असेल तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या negative emotions ना बढावा देऊ नका, त्यांच्या बरोबर त्यांचं दुःख हलकं करताना तुम्ही रडू नका.. किंवा दुःखाशी स्वतःला relate करू नका. नाहीतर तुमची ऊर्जा ते नकळत शोषुन घेतील आणि तुमच्याशी बोलून गेल्यावर त्यांना खूप बरं वाटलं आणि तुम्ही मात्र down व्हाल.

काहीवेळेस आपण काही समूहांशी विविध कारणांनी जोडलेले असतो. यात फेसबुक वरचे virtual समूह सुद्धा आले बरं का.
जर समूहात काही लोकं नकारात्मक विचार प्रसारित करत असतील, किंवा सतत बोलत असतील तरीही सावध. अमेरिकेत तिथल्या निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्षां विरुद्ध असे खूप virtual आणि प्रत्यक्ष समूह बनवले गेलेत. आपला त्यावर चांगले किंवा वाईट बोलण्याचा विषय नाही. पण Mass influence खाली येऊन लोकं अप्रत्यक्ष पणे ही नकारात्मकता स्वताच्या आयुष्यातही आमंत्रित करतात हे त्यांना समजतच नाही.

आपल्या मनात विचार हे बाहेरील विचारविश्वामधून येत असतात.. आपल्याला वाटलं की मी हा विचार केला तरी आपण ज्या vibrations वर आहोत त्यांच्याशी मिळतेजुळते विचार आपल्या पर्यंत बाहेरून येतात आणि आपण ते ग्रहण करत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक संगतीत राहिलात, तर कुठले विचार घ्याल हे तुम्हीच ठरवा.
पूर्वीं लोकं यासाठीच म्हणत “सुसंगती सदा घडो”.

5. नामस्मरण (mantra chanting)
आपल्या ऋषी मुनींनी तप साधनेच्या बळावर कुठले स्वर, शब्द रचना एकत्रित करून विशिष्ठ संख्येत म्हटल्या की त्याचा काय परिणाम आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर, वातावरणावर, विशिष्ठ कारणासाठी होतो हे शोधून मंत्र शास्त्र विकसित केले. नामस्मरण किंवा एखादा विशिष्ठ मंत्र जेव्हा आपण विशिष्ठ संख्येत रोज म्हणतो, तेव्हा तो तुमच्या तेजोवलयाला शुद्ध आणि strong करत रहातो. Natural protection देत रहातो. आधुनिकतेच्या नावाखाली आपण नामस्मरणाकडे दुर्लक्ष करतो पण याचे प्रचंड फायदे आहेत.

6. पवित्र स्थळे/ तीर्थक्षेत्रे
काही जागांची स्पंदनं चांगली नसतात. स्मशान, मद्यालये, किंवा तत्सम इतर वाईट कृत्ये होत असणाऱ्या जागा. या ठिकाणी आपले तेजोवलय पटकन संक्रमित किंवा दुषित होऊ शकते. याउलट काही जागा अतिशय पवित्र आणि उच्च स्पंदने असलेल्या असतात. पृथ्वीच्या पाठीवर अशी 7 मुख्य ठिकाणे (power spots) आहेत ज्याना पृथ्वीची सप्तचक्रे म्हणतात. भारतात हिमालयात कैलास पर्वत हे असे ठिकाण आहे की जिथे उच्चतम सकारात्मक स्पंदने आहेत आणि त्याला पृथ्वीचे सहस्त्रार चक्र म्हणतात. जागांची स्पंदने विचारात घेऊन पूर्वजांनी मंदिरांची स्थापना केली. प्राचीन काळी तीर्थयात्रेला जायची प्रथा याचसाठी होती की आपले तेजोवलय शुध्द व्हावे. तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरात जाण्याचा नेम ठेवा.

7. प्राणायाम/ योगासनं/ व्यायाम.
प्राणायाम हा तेजोवलय clean आणि स्ट्रॉंग ठेवण्याचा अतिशय परिणामकारक उपाय आहे. पण तज्ञानकडून शिकून मगच करावा.
योगासने आणि त्यातही सुर्य नमस्कार हा ही अतिशय प्रभावी आहे.

8. पौष्टीक आहार, rest आणि पूर्ण झोप
याबद्दल वेगळे सांगायची गरज एव्हढ्याचसाठी की ह्या तीन अतिशय basic गोष्टी सुधा आपण आजकाल न पाळल्यामुळे तुमचे तेजोवलय weak होऊ शकते.

9. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे
आपण सर्व निसर्गातील पंचतत्वातून जन्मलो आणि परत तिथेच जाणार आहोत. निसर्गातून, झाडं, हिरवळ, डोंगर, नद्या, यातून प्राणशक्तीचा खजिना आपल्याला मिळत असतो. आपले तेजोवलय नैसर्गिक रित्या clean आणि strong
ठेवायला निसर्ग खूप मदत करतो.

वर दिलेले जास्तीत जास्त उपाय रोजच्या रोज आपल्या आचरणात ठेवले तर आपले तेजोवलय आपण रोजच्या रोज शुध्द ठेऊ शकतो. पण काही कारणाने जर तेजोवलय खूपच damage झाले असेल आणि मोठ्या प्रमाणात त्याची लक्षणं दिसत असतील तर खालील उपाय तज्ञ व्यक्तीकडून करून घेतल्यास खूप फायदा होतो.

10. Holistic healing methods..

1. रेकी किंवा इतर ऊर्जा उपचार
2. Crystal थेरपी
3. Sound थेरपी
4. Aroma थेरपी
5. Flower थेरपी

पूर्वी आपली आजी किवा आई, आपल्याला काही झालं की ..किंवा शुभकार्यानंतर दृष्ट काढायची, आठवतं..? तेजोवलय स्वच्छ किंवा शुद्ध करण्याचाच तो प्रकार आहे. मीठ आणि मोहोरी या दोन्हीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद आहे. तसेच बाहेरून घरी आल्यावर चप्पल घराबाहेर काढून बाहेरच विहिरीवर डोक्यावरुन आंघोळ करून मग घरात यायचं अशी पद्धत होती.. त्यांचं कारण लक्षात आलं..?
बाहेरील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल तेजोवलय शुद्ध रहावं.. जेवायच्या आधी जेवणाच्या ताटाला नमस्कार करून एखादा श्लोक म्हणून जेवायची पद्धत. जेणेकरून जेवण बनवणाऱ्याची नकारात्मक विचारस्पंदन निघून जावीत. या खूप लहान गोष्टी आहेत पण तेजोवलय शुद्ध ठेवायला खूप मदत करतात.आता सुद्धा आपण यातलं जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं.

गौतम बुद्धांचे तेजोवलय त्यांच्या शरीरासभोवती 3 मैल पसरलेलं असायचं. ज्या यशस्वी प्रभावी व्यक्ती आपल्याला इतरत्र दिसतात, त्यांचे तेजोवलय सुद्धा अतिशय strong असते. तेजोवलय हे साध्या डोळ्यांना दिसत नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अविश्वास दाखवतो. पण त्याचे सखोल ज्ञान घेऊन आपणही आपले आयुष्य यशस्वी आणि प्रभावी बनवू शकतो.

हा ह्या लेखमालेचा शेवटचा भाग आहे. आशा आहे की ह्या ज्ञानाचा उपयोग सर्वाना होऊन आपले आयुष्य आनंदी, आणि यशस्वी होईल. ही लेखमाला वाचून आपले उस्फूर्त अभिप्राय देऊन आपण सर्वांनी मला लिहितं केल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!!!

-वैशाली देशपांडे
20.04.2017

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..