नवीन लेखन...

मन की बात – DNA व Dna

DNA ( Deoxyribo Nucleic Acid). डीएनए मध्ये जीवाबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मनुष्य प्राण्यासहीत सर्वच सजीवांमधे हे घडतं. शाळेत असताना कधीतरी उत्तरापुरती घोकंपट्टी केलेली ही माहिती.

कोणत्याही प्राण्याचं स्वरूप कसं असावं हे DNA ठरवतात. जसं की रूप, रंग, डोळ्याचा रंग, आकार, केस/कातडीचा रंग इ. इ. हे सर्वच जीवांच्या बाबतीत घडतं. इथपर्यंत मनुष्य प्राण्यासहीत सर्वच सजीवांमधे घडतं.

मग मनुष्य आणि इतर प्राणी यांत वेगळंपण काय? तर काहीच नाही. बुद्धीने मनुष्य मोठा आहे यात वाद नाही परंतू छोटी-मोठी कामापुरती बुद्धी तर प्रत्येक जीवाला असतेच..मग मनुष्यात असं वेगळेपण काय?

मनुष्य आणि इतर सजीव प्राणी यांच्यात DNA चा प्रभाव सारखाच असला तरी मनुष्य इतर सजीवांपासून वेगळा ठरतो तो Dna, म्हणजे ‘ज्ञ’, म्हणजे ‘ज्ञाना’मुळे..! DNA मुळे मनुष्य’प्राणी’ घडतो, तर Dna (ज्ञ)मुळे मनुष्यातून प्राणीत्व वगळून त्याचा माणूस घडण्याचा प्रवास निरंतर चालू असतो..!

‘ज्ञ’ म्हणजे बुद्धी. सर्वच सजीवांत असते ती. परंतू मनुष्याच्या बुद्धीचा प्रवास सतत सुरूच असतो. पहील्या DNA मुळे अनेक गोष्टी आपल्याला काहीही कष्ट न करता आपोआप मिळत असतात. तर दुसऱ्या Dnaसाठी आपल्याला विषेष प्रयत्न करावे लागतात. दुसरा Dna वारसाहक्काने मिळत नाही. तो मिळवावा लागतो. तो निसर्गात मिळतो, परिसरात मिळतो. तो आपल्याला भेटणाऱ्या विविध माणसांतून मिळतो तर कधी वाचलेल्या पुस्तकांतून मिळतो..तो सर्वत्र आहे फक्त नाक-कान-डोळे आदी पंचेद्रीये सतत सजग ठेवावी लागतात आणि हे प्रयत्नाने अगदी सहज साध्य आहे..!

DNA आपल्याला मिळालाच आहे आई-वडीलांकडून, आपण दुसरा Dna मिळवण्याचा प्रयत्न करू व त्यालाठी गुरूची आवश्यकता असते. तो गुरू निसर्ग, परिसर, पुस्तकं किंवा आपल्याला ज्यापासून शिकायला मिळेल अशी कोणतीही सजीव-निर्जिव गोष्ट असू शकेल..आपण फक्त टिपकागद होणं गरजेचं आहे..!

-नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..