नवीन लेखन...

प्रवास; एक समृद्ध करणारा अनुभव..

सकाळचा उत्तराखंडातल्या नैनीताल जिल्ह्यातील रामनगर ते जुनी दिल्ली असा प्रवास, ‘रामनगर -दिल्ली संपर्क क्रांती लिंक एक्सप्रेस’ अशा त्या रेल्वेसारख्याच लांबलचक नांवाच्या रेल्वे गाडीनं केला. उत्तर प्रदेश-बिहारकडच्या रेल्वेप्रवासातील गर्दीच्या काही फिल्म्स डिस्कव्हरी-नॅशनल जिओग्राफीक चॅनलवर पाहील्या होत्या, त्या प्रत्यक्ष अनुभवल्या. ‘फेव्हीकाॅल’ची ती गाडीला माणसं चिकटलेली प्रसिद्ध निशब्द आणि पकिणामकारक अॅड तिच्या निर्म्यात्याला बहुतेक इथेच सुचली असावी असं मला वाटतं. आमचं रिझर्वेशन असुनही अंग चोरून बसावं लागलं होतं, एवढी गर्दी. खुप वर्षांनी ‘माणसां’तून प्रवास केल्यासारखं वाटलं. आपल्यासारखे पांढरपेशे लोक समाजातल्या ज्या थरातील लोकांकडे पाहून नाक मुरडतो, तसल्या तथाकथीत ‘लो क्लास’ समाजाची गर्दी होती ती. पण ही माणसं खऱ्या अर्थानं ‘माणसं’ असतात. सेकंड अथवा थर्ड क्लासवाल्यांची माणूसकी ही अस्सल असते कारण त्यांचं जगणं एकदम असली असतं. त्यांचं प्रेमही अस्सल, दोस्तीही अस्सल आणि दुश्मनीही अस्सलच, बाकी आपण पांढरपेशे त्यांच्या तुलनेत खुपच नकली जगत असतो, याचा मला पुन्हा पुन्हा अनुभव येत असतो. इथंही आलाच..

संपूर्ण वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा..

https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1351494784905375

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..