नवीन लेखन...

बातम्यांचे आकर्षक आणि खेचक मथळे

आज पन्नाशीच्या पुढे असलेल्या मंडळींना “अमृत” वगैरे मासिके आठवत असतीलच. या मासिकांमध्ये “मुद्राराक्षसाचा विनोद” वगैरेसारखी मनोरंजक सदरे असत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या मुद्णावर अचूक बोट ठेवून त्यातल्या चुका दाखवून त्यातून मनोरंजन करणे हाच या सदरांचा उद्देश.

सध्या “ब्रेकिंग न्यूज” आणि खळबळजनक मथळ्यांचा जमाना आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या हल्ल्यामुळे वर्तमानपत्रे जरा मागेच पडलेली आहेत. “ब्रेकिंग न्यूज” आधल्या दिवशी बघितल्यावर पुन्हा बातमी कोण कशाला वाचेल ? मात्र वृत्तपत्रातल्या बातमीचा मथळा दिलखेचक असेल तर ती बातमी किंवा लेख हमखास वाचला जाणार असेच हे गणित.

काही बातम्यांचे मथळे असेच आकर्षक आणि खेचक असतात. त्यातलेच काही नमूने….


– खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते,
‘भाळी तिच्या, जन्म आभाळी.’


– वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्क असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं,
‘मापात पाप’ करणार्‍यांना चाप!


– काही वर्षापूर्वी मुंबई पावसात तुंबली. एका बातमीचं हेडिंग होतं..
‘तुंबई’!


– आणखी एका बातमीचं हेडिंग …
“अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक!”


बाय द वे, एक आठवणीतलं हेडिंग आठवलं.
‘जीव वाचवण्यासाठी पळताना खड्ड्यात पडून मृत्यू! ‘


सौरभ गांगुली आणि युवराज सिंग यांनी त्रिशतकी भागीदारी पाकिस्तानविरुद्ध केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली.

लोकसत्ता फ्रंट पेज हेडिंग.

डाव्यांचा तडाखा


मागे कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्याच्या बातम्या खूप वाचल्या जायच्या. सहाजिकच, साक्षी, पुरावे, उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा.
त्याच काळात, एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती, ‘नाम्या, बगतूस काय? घाल गोळी!’
… नंतर रिक्षांच्या मागेही दिसू लागले… ‘नाम्या, बगतूस काय, घाल गोळी!’


राहुल द्रविड च्या निवृत्ती वेळी एका इंग्रजी पेपर चा अप्रतिम मथळा होता.
‘indian team is now bread n butter but without jammy’


भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली, तेव्हाचा एक अप्रतिम मथळा….
‘चारले खडे आता वानखेडे’


पतंजली कोलगेटचे दात पाडणार! – मटा ऑनलाइन


हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…

गोव्यात पाळी नावाचं गाव आहे.विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी पाळी हा एक मतदारसंघ होता. निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले. मोठा मेळावा घेतला. धडाकेबाज भाषणे झाली. गोव्यातल्या एका नामांकित मराठी दैनिकाने दुस-या दिवशी हेडिंग दिले,
“डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडविणार”!


वादग्रस्ततेमुळे खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तिथला कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्याचे पंढरीनाथ सावंत याने दिलेले हेडींग अजून लक्षात राहिले आहे.

खैरनार देवनारचे पवनार करणार


या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वर्षी प्रचंड म्हणजे प्रचंडच पाऊस झाला. अलीकडच्या 26 जुलैसारखाच. सारी मुंबई ठप्प झाली. लोकसत्ताची हेडलाईन होती – मुंबापुरीवर जलात्कार !!!


मस्त… दिलखेचक शीर्षकांच्या आठवणींचा पाऊस पडतोय इथे. याच सम्दर्भात २००४ साली अटल सरकारचा पराभव करुन कॉंग्र्स बहुमताने जिंकली त्यावेळचं टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं, King Cong… Queen Sonia. अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं हा भाग वेगळा.


बुटासिंघ २००५मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य युतीला सरकार बनविण्यापासून रोखले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवीत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते. तेव्हा एक शीर्षक होते(बहुधा “सामना”चे) – सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला “बुटा”ने हाणले.


मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले होते तेव्हा लोकमत कि कुठल्याशा वर्तमानपत्राने ‘ तांबेचं पितळ उघडं’ अशी बातमी दिली होती.


‘वडील लग्न करत नसल्याने मुलाची आत्महत्या’


डिसेंबर २०१३ मध्ये, निवडणूक निकालानंतर, लोकसत्ता च्या मुख्य बातमीचे हेडिंग होते,
‘हाताची घडी, कमळावर बोट! ‘


नवाकाळचे एक हेडिंग : श्रीकांतने जयसूर्याला गिळले. भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली श्रीलंकेत हनुमान जयंती !


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..