नवीन लेखन...

आशेचे किरण कि निराशेचा ढग…….!!!

आशेचे किरण कि निराशेचा ढग…….!!!

पाहतो मी वाट चातकासारखी

आषाढ मासे प्रथम दिवसे,

परंतु कोणालाही चाहूल,

त्या पावसाची न दिसे……….

त्यातच आली जवळ आषाढी एकादशी,

वारीयांची वारी जवळ जात असे,

नामाचा गजर जोरदार झाला,

परंतु तो पाऊस तरीही

न आला……….

पाऊस नाही येत म्हणून,

लागले डोळे आकाशाकडे,

अंधारून येताच प्रकटे,

त्यात एक आशेचा किरण कि निराशेचा ढग………

शेतकरी हवालदिल झाला,

शहरातही लोक झाले वेडेपिसे,

पाण्यावाचून माशाला वाटेल,

जीवन कसे जगावेसे?…………

निराशेच्या ढगामुळे,

लागेल कां हो सगळ्यांना धग?

पाऊस नाही बरसला तर,

पाणी कसे मिळेल मग?……………

…………………….मयुर तोंडवळकर

— मयुर तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..