नवीन लेखन...

शेतकर्‍यांच्या विवंचना

शेतकरीही सुद्धा माणूस आहे,

शेती करून पोटाची खळगी भरत आहे !

निसर्गही त्याच्यावर कोपला आहे,

पाण्याविना तडफडत आहे !

शेतकरी गुराबैलांवर मुलांप्रमाणे प्रेम करतो,

चारापाणी न मिळाल्याने धायमोकलून रडत असतो !

गुराबैलांसाठी सरकारी छावण्या उभारल्या आहेत,

भ्रष्टाचार्यांमुळे उघड्या बोडक्या झाल्या आहेत !

कोणाला सांगणार ही व्यथा?

व्यथांच्या झाल्या आहेत कथा,

ज्यांना सांगायचे तेच “खफा” !

व्यथा सांगून सांगून दमला आहे,

सावकारांची देणी फेडता फेडता

कंठात प्राण आला आहे !

माणूस माणसालाच परका झाला आहे,

देवाच्या अकारण कारुण्याने

कसाबसा दिवस ढकलतो आहे,

माणुसकी जपता जपता

स्वत:लाच हरवून बसला आहे !

सरकार दरबारी न्याय मिळेल म्हणून आशावादी आहे,

कुंपणच शेत खाऊ लागले आहे,

नाही म्हणायला आता ‘त्याच्या’वरच अवलंबून आहे !

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..