नवीन लेखन...

मानव-जग-परमेश्वर





 शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु

जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये

घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते.

एक आकाश आणि पोकळी सर्वत्र जाणवते. बाहेर घरांत पेटीत डबीत आणि सुक्ष्म अशा अणूमध्येही. पोकळी तेथे हवा अर्थात आकाश. विशाल वा सुक्ष्म. ह्याच माध्यमातून जगातल्या सर्व वस्तू एकमेकांच्या संपर्कात असून बांधल्या गेलेल्या आहेत. हा वायुरुप पोकळ्यांचा संपर्क असेल. माणसाच्या देहामध्ये देखील हवेचा संपर्क असतो. तसेच आकाशाच्या पोकळी असलेल्या अनेक जागा असतात. प्राणवायु तर जीवंतपणाचे लक्षण होय. वातावरणातील हवेचा सतत संपर्क येणे ह्या क्रिया फुफूसामार्फत देहात चालू असतात. अंतरदेहाचा बाह्य जगाशी ह्याच माध्यमाने संपर्क असतो.

महासागर समुद्र नदीनाले तलाव विहीरी ढग पाऊस आणि सुक्ष्म असा पाण्याचा थेंब. ह्या जगातील अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या द्रवरुप माध्यमाची ही जाण आहे. जमीनीपेक्षाही प्रचंड प्रमाणात पाण्याची रचना केलेली दिसते. मानवाच्या शरिरांत देखील असेच पाण्याचे प्रमाण खूप असते. पाणी हेच जीवन समजले गेले आहे. प्रत्येक अवयवांत व त्याच्या सुक्ष्म पेशीत, सेल्समध्ये मुबलक पाण्याचे प्रमाण असते. देहाच्या जगण्यामधला पाणी हे महत्वाचे अंग असते.

पृथ्वी म्हणजे काय ? प्रचंड प्रमाणात जीचे अस्तित्व असते तो जगाचा भाग. केवळ माती व दगड ह्यानी व्यापलेला. हलकी भुसभुशीत ती माती, व ज्याचे स्वरुप कठीण वाटते तो दगड. तसे दोन्हीही एकच. माती म्हणजे काय असते ? अधुनिक शास्त्राने त्याचे विश्लेशन केले आहे. मातीमध्ये जवळ जवळ ११० मुळ घटक पदार्थ अर्थात Elements (धातू)

सापडले आहेत. जसे सोने, चांदी, लोह, तांबे, जस्त, सोडीयम, पोट्याशियम, ऑक्सीजन, हैड्रोजन, क्लोरीन, इत्यादी. हे घटक पदार्थ निरनीराळ्या प्रमाणात मातीमध्येच असतात. वा त्याच्याच प्रमाण बद्धतेनुसार निरनीराळ्या प्रकारची माती बनत असते. माती दगडाचे दृष्य स्वरुप हे भिन्न वाटत असले तरी विश्लेशनात्मक दृष्टीने ते अन्तीमतः मुळ घटक elements याचेच मिश्रण वा संयुक्त होय. निरनीराळे नैसर्गिक गुणधर्म बाळगुन. मानवी देह हा काय आहे ? त्याचेही घटनात्मक विश्लेषन करु लागलो तर तो सुद्धा मातीचाच बनलेला लक्षांत येते. इंद्रिये, अवयव, रक्त , मास, हाडे, कातडी, ह्या सर्व भागांचे विश्लेषन दाखविते की त्याचे गुणधर्म फक्त मातीचेच असतात. ज्यात फक्त असतात मुळ घटक पदार्थ ( Elements). निरनीराळ्या प्रमाणे प्रमाणशील बांधलेले. मृत देह जाळला वा पुरला तर तो शेवटी मातीमध्येच एकरुप होतो. म्हणूनच विद्वानानी मानवी देहाला मातीचा घटाकार म्हटले आहे.

ह्या संपूर्ण घटक पदार्थाचे जर सुक्ष्म रितीने विश्लेषन केले तर आपण अणू (Atom ) ह्या संकल्पने पर्यंत जातो. मुळ घटक पदार्थ ( Elements) नैसर्गिक गुणानी भिन्न भिन्न असतात. आजच्या अद्यावत विज्ञानाप्रमाणे अणूचे विभाजन पून्हा परमाणू त्यांत धन (Positive ) व ऋण (Negative ) शक्ती इत्यादी वर्णने आहेत. ही अणूतील उर्जा शक्ती प्रचंड असते. जी उर्जा अणूत आहे तशीच ती पेशीत देखील सुप्त अवस्थेत असते. पेशीमधल्या एकत्रीत शक्तीमुळेच शरीर मनाचे कार्य़ चालू असते. मानव देहातले तेज म्हणतात ते हेच.

पंच महाभूतांचे म्हणजे आकाश वायु आप (पाणी) पृथ्वी आणि तेज ह्याचेच आस्तित्व ह्या संपूर्ण जगामध्ये , मानवामध्ये असल्याचे जाणवते. वस्तू निराळ्या, नांवे निराळी, गुणधर्म निराळे, परंतु सर्वाचे मुळतत्व एकच असल्याचे आम्हास जाणवू लागते. दिसणारा भासणारा पदार्थ आणि त्यांत असलेली शक्ती. कोणतेही कार्य ज्यातून केले जाते त्या माध्यमाला पदार्थ संबोधले गेले. ज्यामुळे ते कार्य होऊ शकते त्याला चेतना अथवा उर्जा वा शक्ती म्हटले गेले. त्यामुळे प्रत्येक पदार्थ आणि त्यातील उर्जा हे दोन दिसत असले तरी ते एकच समजले गेले आहे. विचारांच्या लाटेत, ज्ञानाच्या सागरांत, समजण्याच्या प्रांतात हे भिन्नतेने वर्णीले जाते. पदार्थ व शक्ती ह्याना एकच स्वरुपांत मानणारे अद्वैत संकलपनेत जातात. जे एकांतले दोन्ही गुणधर्म याना अलग अलग समजतात त्यांची द्वैत विचारसरणी असते. विचार सामान्यजनाला समजण्यासाठी असतात.

परंतु सत्य आपल्याच जागी राहते. ते केंव्हाच बदलणारे नसते. ह्यालाच तर म्हटले आहे सत्याची जाणीव Reality Consciousness. परमेश्वर जो आहे म्हणतात तो ह्याच्यापेक्षा वेगळा असू शकेल कां ?

कोणत्याही पदार्थाचे व्यक्तीचे वा तथाकथीत देवाचे वर्णन त्याच्या फक्त गुणांत असते. कदाचित वेगळेपणासाठी प्रत्येकजण त्याला आकाररुपांत जाणू इच्छीतो. मात्र खऱ्या अर्थानी त्याची ओळख पटते ती फक्त गुणवर्णनावरुन. अंटार्टीका ह्या बर्फाछादीत प्रदेशांत राहणारा मानव (एस्कीमो ) सर्व साधारण कुणी बघीतला नाही. वा कुणी सहजतेने तेथे जावून तो बघू शकत नाही. तरी देखील तेथे राहणारा मानव कसा असेल हे आम्हास त्याच्या केवळ गुणधर्मावरुनच कळते. कारण मुख्य गुण समजल्यावर आकार,रंग रुप इत्यादी दुय्यम ठरतात. त्या परमेश्वराचा आकार,रंगरुप इत्यादी गोष्टी समजणे जाणणे ओळखणे ह्या गोष्टी देखील दुय्यम स्वरुपाच्याच नव्हे काय ? परमेश्वराला कुणीही बघीतले नाही असे म्हणतात. ते सत्य असेल. करण गुणधर्म हे स्थीर, स्थीत, आणि सदैव असतात., म्हणूनच त्याला त्याचे हे गुणधर्म संबोधले गेले. मात्र रंग रुप आकार हे अस्थीर व बदलणारे असल्यामुळे असत्य वाटतात. पदार्थ बदलत गेला तरी मुळ गुणधर्म सदैव कायम

असेल. हिंदू धर्मात ३३ कोटी देवांची संकल्पना

आहे. ह्यात अनेक रंग रुप आकाराचे देव आहेत. हे जरी सत्य मानले तरी सर्वांत

एक प्रमुख गुणधर्म अस्तीत्वात आहे, आणि त्याला आम्ही म्हटले ” देवत्व, Devine Power, Real Consciousness ” हे सर्वात एकच असते. तो सर्व व्यापी, अविनाशी, सर्वशक्तीमान, आणि निराकार असेल तर ह्याच गुणातील अविष्काराचे जाणीवेचे अनुभव मिळणे हा प्रयत्न असावा. सत्य समजण्याचा हाच मार्ग असेल. सगुण रुपाचे दर्शन मिळाले तरी ते अपूर्ण असेल. निराकार आणि सर्वत्र जाणलेले स्वरुप म्हणजे सुक्ष्म पदार्थात अणूरेणूमधली उर्जाशक्ती. जी प्रचंड तर आहेच परंतु सर्वत्र समावलेली आहे. सुक्ष्मापासून स्थुलात. ह्या जगाच्या संकल्पनेत जेंव्हा दोन्ही अर्थात पदार्थ व शक्ती एकच समजले गेले ते परमेश
वराचे स्वरुप. अद्वैत स्वरुप.

मानव आपल्याला चांगलाच समजला आहे. दैनंदीन जीवन चक्रांत आम्ही संपूर्ण जग देखील जाणले. तो महान परमेश्वर सर्वत्र चराचरांत, अणूरेणूत, महासागरांत, नदीतलावांत, डोंगरदऱ्यांत, वनश्रीमध्ये, वन्यप्राण्यात, आगदी तुमच्या आमच्या शरीरांत देखील पसरलेला आहे. त्या परमेश्वराचा अनंत स्वरुप पसारा जाणण्याची कोणतीही शक्यता आपल्या इंद्रियामध्ये नाही. मग तो परमेश्वर कसा दिसू शकेल.

पौरानीक कथा सांगते की श्री कृष्णानी फक्त अर्जुनाला ते ईश्वरी दिव्य स्वरुप दाखवण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाला ते सहन झाले नाही. त्याने स्वतःचे डोळे एकदम मिटून घेतले.

हां एक मात्र शक्य आहे . त्या परमेश्वराचा अंशात्मक अनुभव तुम्हाला मिळू शकतो. जीवनचक्रामध्ये प्रत्येकाला मिळणारा आनंद – समाधान-शांतता अर्थात सत् चित् आनंद हेच तर त्या परमेश्वराचे स्वरुप होय. ह्यालाच म्हणतात Reality of Consciousness वा सत्याची जाणीव

ललित लेख

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..