नवीन लेखन...

प्रेरणा – ‘जागते रहो‘

‘जागते रहो‘ या सिनेमात शेवटी येणारं जागो मोहन प्यारे, नवयुग चूमे नैन तुम्हारे. हे भैरवातलं बंदिशगीत आपल्याला रात्रीतून पहाटेकडे नेतं. खेड्यातून शहरात आलेला एक तरुण.राज कपूर. तहानलेला.पाण्यासाठी दारोदार वणवण हिंडत असता एका रात्रीत शहराचं भयाण वास्तव अनुभवणारा.

प्राचीन रागरागिण्यांच्या वर्गीकरणातल्या मुख्य सहा रागांमध्ये भैरव हा आहे. भैरवकुळात अनेक रागरागिण्या गुण्यागोविंदाने राहतात. कालिंगडा, रामकली हे त्याचे आप्त आहेत, तर नट भैरव, भैरव- बहार असे जोडराग त्याचे मित्र आहेत.

झुंजुमुंजू व्हायला येतं, पण पाणीही मिळालं नाही म्हणून त्रासलेला असा तो… शेवटी सामान्य स्थितीतली घागरीनं पाणी भरणारी स्त्री- ‘नर्गिस- घागरीनं पाणी त्याच्या ओंजळीत घालतेय.भैरवाच्या सुरांनी झालेली पहाट! सिनेमा संपतो,पण तो भैरव कायम मनात रेंगाळत राहतो.

विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो,

शोमॅन आर के चा ‘जागते रहो’ हा खरे तर एक व्यंगात्मक चित्रपट.जवळपास या चित्रपटात राजकपूरच्या तोंडी संवादच नाही.एक घोटभर पाण्यासाठी दारोदारी फिरत त्याला आलेले अनुभव आपल्यासमोर मांडणारा.

हा चित्रपट पाहतांना तुम्हांला तुमची सध्याची स्थिती यात जाणवेल. पाणी म्हणजे जवळपास तुम्हांला हवी असलेली मनासारखी पोस्ट. तेव्हा संयम ठेवा. आपल्याला येत असलेल्या बऱ्या वाईट अनुभवाने जगणे शिका. एक दिवशी तुम्हांलाही नर्गिस मिळेल. जी तुमच्यासाठी पाणी (पोस्ट) घेउन तुमची वाट पाहत असेल.

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..