नवीन लेखन...

दुष्काळ

शून्यात चित्त लावून विचार करतो मी जेव्हा,
तेव्हा स्वतालाच प्रश्न विचारतो की त्या दुष्काळग्रस्तानपैकी
मी ही एक असतो तर कसा टिकलो असतो दुष्काळात …..

दिवसाला १५० लिटर पाण्याची विल्हेवाट लावणारा मी
कसा जगलो असतो अथक परिश्रम करून मिळविलेल्या
त्या हंडाभर पाण्यात….

पाण्यासाठी पाण्याविना उन्हातान्हात भटकताना
काला पडलेला माझा चेहरा न धुता मलाच
कसा दिसला असता आरश्यात…..

स्वताच्या मालकीची कित्येक एकर जमीन असताना
पोटापाण्यासाठी निर्वासितासारखा माझ्याच राज्यात
भटकताना मी कसा दिसलो असतो चारचौघात ….

पाणी मिळवलही असत पायपीठ करून
पण ! पोट भरायला अन्न लागत
काबाड कष्ट न करता ते कोठून सारल असत पोठात…

राहून राहून एकच प्रश्न मला सतावतो
आजच्या कलियुगात एक माणूसच
का पाहतो दुसर्‍या माणसाला पाण्यात ….

दुष्काळग्रस्तानपैकी नसलो म्हणून काय झाल
त्यांच्या वेदना माझ काळीज चिरतात
याचा अर्थ माझ्यातील माणूस आजही जिवंत आहे…..

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..