नवीन लेखन...

चांगुलपणा कधीच वाया जात नसतो

एक लक्षात ठेवा……
चांगुलपणा कधीच वाया जात नसतो…..
त्याच फळ देव कधीतरी आपल्याला देतोच.
आपण कोणाला केलेली छोटी किंवा मोठी मदत,
कोणाला दिलेला आर्थिक स्वरुपात मदतीचा हातभार,
रोज एखाद्या झाडाला नियमितपणे घातलेले पाणी,
वाढदिवस व लग्नांचा अवाढव्य खर्च वाचवुन कधी भुकेल्या माणसांना पोटभर जेवण देणे..
स्वताःच पक्षांकरिता व रस्त्यावरील बेघर जनावरांना नियमितपणे अन्न व पाण्याची सोय करणे….
गरीब विद्यार्थाला दिलेला शाळेय शिक्षणासाठीचा योग्य वा आर्थिकदृष्ट्या आधार….
अपंग व्यक्तिस व वयोवृध्दांना घाईगडबडीच्या वेळी मानसन्मानाने आपल्या गाडीतुन दिलेली लिफ्ट….
घरातील न लागणारे जुने सामान, वस्तु आणि जुने कपडे हे सर्व एखाद्या गरजु कुटुंबाला पुन्हा वापराला देणे ….
असे बारीकसारीक गोष्टीसुध्दा स्वमनाला भरपुर आनंद देऊन जातातच …… आणि हो,
ही अशी काम बाकीचे करत नाहीत तर मीच का करावे अस आपण म्हणत बसायचे नाही, कारण चांगली कामे करायला कोणतीच जात पात, धर्म, राजकारण, सामाजिक विषमता, स्त्री, पुरुष, शहाणा, अडाणी, गरीबश्रीमंत असा कोणताच भेदभाव मध्ये येत नसतोच…..
आपण आपल चांगल काम चालुच ठेवायच… ईतरांच त्यांच्यापाशी….. फक्त आपल्यातला “चांगुलपणा” कमी होऊ द्यायचा नाही…. हे लक्षात ठेव…..”….अस माझी आजी मला लहानपणी सांगत होती.
माझ्यातर लक्षात आहेच..
जमल्यास तुम्हीपण लक्षात ठेवा….

— विवेक जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..