नवीन लेखन...

किचन क्लिनीक – तांदुळ

कोकण गोवा केरळ प्रांतातील जनतेचे आहारामधील प्रमुख घटक होय.ह्याचा नुसता भातच नव्हे तर ह्या पासून अनेक पदार्थ बनविले जाता जसे पुलाव,बिर्याणी,साखरभात, घावन,इडली,डोसे,भाकरी,पायस इ.आणी प्रत्येक रूपात ह्याची चव अप्रतीम लागते.

ह्याचे उकडे,सुरे असे दोन प्रकार असतात.तसेच ह्याच्या अनेक पोटजाती देखील असतात जसे कोलम,सोनामसुरी,बलम,बासमती इ.आणी हो प्रत्येक तांदुळाची चव वेगळी लागते बरं का.

सर्व प्रकारच्या भातामध्ये साठे साळी हा भात श्रेष्ठ असून त्यात देखील काळा व पांढरा असे दोन प्रकार असतात त्यात पांढरा उत्तम मानला जातो.

सुरे तांदुळ पचायला जड असतात तर उकडे तांदुळ पचायला हल्के असतात.सर्वच तांदुळ चवीला गोड असतात पण साठे साळी मात्र मागुन थोड्या तुरट चवीचे लागतात.तांदुळ पचायला हल्के,स्निग्ध,थंड,पित्तघ्न,अल्प कफवातकर,शरीर पुष्ट करणारे,वृष्य,अल्प मल उत्पन्न करणारे आहेत.

आता तांदुळा पासुन बनविलेल्या विविध व्यंजनांचे गुण पाहुया:

१)यवागु(कण्हेरी):

१ भाग तांदुळ व ६ भाग पाणी घालून केली जाते ती दाट कण्हेरी.हि पचायला हल्की,मल बांधुन ठेवणारी,तहान कमी करणारी,जुलाब,ताप ह्यात उपकारक,मुत्रल आहे.

२)अटवल(विलेपी):

१ भाग तांदुळ व ४ भाग पाणी घालून कण्हेरी पेक्षा दाट केली जाते तिला अटवल म्हणतात.हि भुक वाढविणारी,हृद्य,बल्य,पचायला हल्की,जखम,ताप,डोळ्याचे रोग ह्यात पथ्यकर,गोड,रुचिकर,पौष्टीक,तहान कमी करणारी व मल बांधुन ठेवणारी असते.

३)पेज(पेया):

१ भाग भातामध्ये १४ भाग पाणी घालून केली जाते ती पेज.हि थकवा,ताप,जुलाब ह्यात पथ्यकर आहे,पचायला हल्की,भुक वाढविणारी,रुचिकर,वात व मल ह्यांना पुढे सरकवणारी,घाम उत्पन्न करणारी आहे.

४)मंड:

पेजेतील शितें काढली कि जो द्रव भाग उरतो तों म्हणजे मंड होय.हा पचायला हल्का,थंड,मल बांधुन ठेवणारा,भुक वाढविणारा,ताप,अतिसार ह्यात पथ्यकर,चक्कर येत असल्यास ती कमी करणारा,कफ पित्त नाशक आहे.

(क्रमश:)

(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..